रविवार, 10 मार्च 2013

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे

-
Monday, March 11, 2013 AT 04:30 AM (IST)
मुंबई- विधिमंडळ काळात सकाळी जोरदार भाषण करून सायंकाळी "सेटिंग' करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांची पद्धत नसल्याचा जोरदार टोला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेत्यांना लगावला. त्याच वेळी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसेचे आमदार विरोधक म्हणून आक्रमक भूमिका निभावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज'वरील पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना, रिपाइंच्या वतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते उपस्थित नसल्याच्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आतापर्यंत सरकारच्या विरोधातील जलसंपदा, गृहनिर्माण आदी भ्रष्टाचार आपणच मोठ्या प्रमाणात बाहेर काढले असून, विरोधकांमध्ये कोण सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो, हे आता लोकांना कळणार असल्याचा टोला मनसेला लगाविला होता. त्याबाबत राज यांना विचारणा केली असता सकाळी जोरदार भाषण करून सायंकाळी "सेटिंग' करण्याची मनसेमध्ये पद्धत नसल्याचा भीमटोला खडसेंना लगाविला.
...
रतन टाटा यांचा आशीर्वाद
उद्योगपती रतन टाटा यांनी घरी येऊन घेतलेल्या भेटीकडे आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहत नसून त्यांच्याकडून मला मिळालेला आशीर्वाद म्हणूनच मी त्याकडे पाहत आहे. वाघांची शिकार थांबविण्यासाठी अशा अभयारण्याच्या ठिकाणी टाटा ग्रुपने हॉटेल्स काढल्यास वाघ मारण्याऐवजी वाघ दाखविणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी सूचना आपण टाटा यांना केली असल्याचे राज यांनी सांगितले.
...
दुष्काळाचे कारण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नेमलेल्या नेत्यांमुळेच राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असल्याची टीका राज यांनी केली. या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळेच दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने विकासकामेच करण्यात आली नसल्याची टीका त्यांनी केली.
...
मनसे होणार आक्रमक
मनसेच्या सर्व आमदारांची आज सकाळी 10पासूनच "कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, असे समजते. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना दुष्काळ, जलसंपदा आदी विषयांवरून सळो की पळो करून सोडण्याचा आदेश आमदारांना दिल्याचे कळते. राज्यात विरोधक म्हणून "मनसे'च्या आमदारांची वेगळी ओळख लोकांपर्यंत गेली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारला धारेवर धरण्यास या आमदारांना सांगण्यात आले आहे