शुक्रवार, 9 मार्च 2012

नाशिकला मनसेचाच महापौर

नाशिकला मनसेचाच महापौर
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, March 10, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - एका बाजूने दोर ढिला सोडला तरी दुसऱ्या बाजूने घट्ट पकडून ठेवत असल्याचा दाखला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसणारच, असा ठाम विश्‍वास व्यक्त केला. तसेच ऐन निवडणुकीत पक्षाबरोबर दगाबाजी करणाऱ्या गद्दारांना एप्रिलमध्ये साफसफाईची मोहीम राबवून धडा शिकविणार असल्याचा इशारा देत, या इशाऱ्याला एप्रिल फूल समजण्याची चूक करू नका, असेही त्यांनी या वेळी गद्दारांना खडसावले.

मनसेचा सहावा वर्धापनदिन आज षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह चित्रपट निर्माते महेश मांजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, आजच्या सभेला मीडियाला अपेक्षित खाऊ देणार नसल्याचे त्यांनी भाषण सुरू करताच जाहीर केले. सहा वर्षांपूर्वी पक्ष काढताना अनेकांनी अनेक सल्ले दिले. पक्ष काढल्यावर लवकर उठण्याचे सल्लेही देण्यात आले होते. पण सहा वर्षांतील मनसेच्या कामगिरीने सल्ला देणाऱ्यांची "झोपमोड' केल्याचा टोला राज यांनी लगाविला.

सहा वर्षांत 13 आमदार आणि शंभर नगरसेवक असा पल्ला पक्षाने गाठला आहे. पण मुंबई आणि ठाण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच गणिताची गडबड एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. जागा जिंकून देणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार आहे. पण निवडणुकीतील गद्दारी सहन करणार नाही. काही कार्यकर्त्यांनी पैशांचे व्यवहारही केले असल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. काही जणांनी मैत्री जपली, काही बेसावध राहिले, काहींनी विजय गृहीत धरला, ऐन निवडणुकीत असे वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार म्हणजे होणारच, असे राज यांनी बजाविले आहे. एप्रिलनंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून या निवडणुकीने मला काय शिकविले याचा दाखला या वेळी देणार असल्याचे ते म्हणाले.

2014 मध्ये चमत्कार पाच वर्षांत मुंबईतील 7 जागांच्या 28 जागा झाल्या आहेत. पाच वर्षांत सात वर्षांचा मुलगा 28 वर्षांचा झाला आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळणार, तेव्हा तेव्हा सत्ता काबीज करीत जाणार, असे सांगतानाच राज यांनी 2014 मध्ये चमत्कार घडणार म्हणजे घडणारच, असा आशावाद व्यक्त करून मनसे मोठ्या संख्येने जागा मिळविणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

जॉर्ज ऑर्कझॅडन व्हा! सुरतवर पहिल्यांदा शिवाजी महाराज स्वारी करण्यासाठी गेले त्या वेळी तेथील मोगलांचा इनायत खान हा सरदार पळून सुरतच्या किल्ल्यावर जाऊन बसला होता. तर त्याउलट जॉर्ज ऑर्कझॅडन याने आपल्या मोजक्‍या सैनिकांसह शहरात गस्त घालून लढण्याची तयारी दर्शविली होती. काही कारणाने शिवाजी महाराजांनी सुरतवरून मोर्चा वळविला. त्यानंतर जॉर्जचा या महाबत खान या सरदाराने रत्नजडित तलवार देऊन सत्कार करण्याचा प्रयत्न केला. पण जॉर्जने स्वतःला मिळणाऱ्या तलवारीऐवजी आपल्या देशाला व्यापाराच्या करातून सवलत देण्याची मागणी केली. सदासर्वकाळ आपल्या देशाबद्दल विचार करणाऱ्या जॉर्जसारखे तुम्हीही सदैव पक्षाचाच विचार करणारे कार्यकर्ते व्हा, असे भावनिक आवाहन राज यांनी या वेळी केले



गद्दारी सहन करणार नाही! - राज ठाकरे

गद्दारी सहन करणार नाही! - राज ठाकरे
-
Saturday, March 10, 2012 AT 04:00 AM (IST)

मुंबई - महापालिका निवडणुकीवेळी अन्य पक्षांनी केले ते राजकारण ठिक आहे. पण मनसेमध्ये ज्यांना ऐनवेळी अन्य पक्षातील मैत्री आणि संबंध आड आले, काही ठिकाणी "व्यवहार' झाले, तर काहीजण बेसावध राहिले, त्यांची कुणाचीही गय केली जाणार नाही. एप्रिल महिन्यात या सर्वांचे "ऑपरेशन' होईल. पक्षात गद्दारी कधीही सहन करणार नाही, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या सहाव्या वर्धापनदिनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

मला इतका येडबंबू समजू नका. मला सगळे कळते, अशी सुरुवात करून राज म्हणाले, या महापालिका निवडणुकीने मला अनेक गोष्टी शिकवल्या. माणसे नक्की कळाली. आणखी काय काय कळाले ते तुम्हाला पुढील महिन्यात समजेलच. जे पक्षासाठी आहेत, पक्षासाठी झटताहेत त्यांच्यासाठी मीही जीव ओवाळून टाकेन. या निवडणुकीत असंख्य कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केले, त्यांना माझा प्रणाम!

मुंबई आणि ठाण्यात या निवडणुकीत अपेक्षित गणिताची मोडतोड झाली, असे सांगून राज म्हणाले, तरीही महाराष्ट्रात आज मनसेचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. वणी आणि खेड या नगरपालिका ताब्यात आल्या आहेत. पुण्यात मनसेचा विरोधी पक्षनेता होणार आहे, तर नाशिकमध्ये कोणत्याही परिस्थितीत मनसेचाच महापौर होईल. मुंबईत गेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सात जागा मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत हा सात वर्षांचा मुलगा एकदम 28 वर्षांचा झाला! असे अन्य पक्षांच्या बाबतीत झाले आहे का?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे महाराष्ट्रात चमत्कार घडवून दाखवेल. आज कुणी यावर विश्‍वास ठेवणार नाही, पण 2014 नंतर आमच्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास बसेल, असा दावा करून राज यांनी एप्रिलनंतर आपण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडणार असून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.

पक्षाची स्थापना केली तेव्हा "पक्ष चालवणे इतके सोपे नसते. लवकर उठावे लागते...' वगैरे उपदेश मला केले गेले. पण आज सहा वर्षांनंतर त्यांचीच झोप उडाली आहे, असा टोमणा मारून राज यांनी "जसजशी संधी मिळत जाईल, तसतसे स्वतःला सिद्ध करत जाईन. मी गंमत म्हणून पक्ष काढलेला नाही', असे विरोधकांना सुनावले

गुरुवार, 8 मार्च 2012

शिवसेनेने दाखवला राज यांना कात्रजचा घाट!

नाशिक महापौरपदाची निवडणूक लढवणार
विशेष प्रतिनिधी, मुंबई

altनाशिकच्या महापौरपदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखविला आहे. यामुळे नाशिकला मनसेचा महापौर बनविण्याचे राज यांचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेची ही भूमिका पाठीत खंजीर खुपसणारी असल्याचे संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.
ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घाम फोडल्यानंतर महापौरपदासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची मनधरणी सुरु केली. यातूनच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांनी थेट राज ठाकरे यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी जाऊन साकडे घातले. यानंतर ठाण्यात शिवसेनेला जनादेश असल्याची भूमिका घेत राज यांनी शिवसेनेला थेट पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातही मनसेच्या पाठिंब्याचे स्वागत करताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जर मनसेने नाशिकमध्ये पाठिंबा मागितला तर शिवसेनाप्रमुखांशी बोलून विचार करू असे सांगितले होते. प्रत्यक्षात गुरुवारी नाशिकमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेऊन मनसेवर राजकीय मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
याबाबत नाशिकचे शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांना विचारले असता मनसेने आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. त्यातच आठ अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला असून संख्याबळाचा विचार करताना आमचा महापौर येणार हे स्पष्ट असल्यामुळे शिवसेनेने अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. जनादेशाचे काय, अशी विचारणा केली असता, ठाण्यात भाजपची नगरसेविका पळवली जाईपर्यंत मनसे गप्प होती. त्यानंतरही आम्हाला केवळ चार जागांची गरज असल्याचे माहीत असतानाही राज ठाकरे गप्प बसून होते. शेवटच्याक्षणी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मनसेचे ४० नगरसेवक असून बहुमतासाठी २२ नगरसेवकांची त्यांना गरज आहे. सेना-भाजप व अपक्षांची संख्या अधिक असल्यामुळे आम्ही महापौरपदासाठी दावा केल्याचे ते म्हणाले.
राज यांनी ठाण्यात पाठिंबा दिल्यानंतरही आता शिवसेनेने नाशिकमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले



मंगलवार, 6 मार्च 2012

मनसेच्या मातोश्रीच्या प्रवासावर नाशिकची सुभेदारी

मनसेच्या मातोश्रीच्या प्रवासावर नाशिकची सुभेदारी
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, March 07, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - शिवसेनेचा ठाण्याचा "ठाणेदार' मनसेच्या पाठिंब्याने दणदणीत मतांनी महापौरपदावर बसला आहे. थेट राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानेच महायुतीचा वादात सापडलेला विजय "निर्विवाद" म्हणून सिद्ध झाला. अशावेळी किमान या पाठिंब्याची बुज राखून शिवसेना नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसविण्यासाठी किमान आडकाठी आणणार नाही, अशी अपेक्षा मनसेचे पदाधिकारी बाळगून आहेत. मात्र त्याचवेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा "मातोश्री'च्या दिशेने प्रवास कधी सुरु होणार, यावरच नाशिकच्या सत्तेचा सारीपाट अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक यंदा प्रचंड चुरशीची झाली. भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्याने तर महायुतीचा महापौरपदावरील दावा धोक्‍यात आला होता. अशावेळी अंबरनाथमध्ये मनसेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी थेट राज ठाकरे यांच्याबरोबर संवाद साधला. यासाठी त्यांनी आपल्या ठाण्यातील विश्‍वासू शिलेदार आमदार राजन विचारे आणि प्रताप सरनाईक यांनाही सोबत घेतले. या तिघांनी मनसेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्यावर मनसे ठाण्यात तटस्थ राहण्याची शक्‍यता व्यक्त होत होती; पण राज यांनी साऱ्यांचे अंदाज धुळीला मिळवून, बाळासाहेब ठाकरे यांना ठाण्याची सत्ता हवी असल्याने आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. या निमित्ताने जांबोरी मैदानात प्रचाराच्या दरम्यान बाळासाहेबांच्या दिशेने आपण शंभर पावले चालण्यास तयार असल्याच्या विधानाचा त्यांनी प्रत्यय आणून दिला. त्याचवेळी नाशिकमध्ये मनसे सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

ठाण्यातील सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात देण्यात राज यांनी पुढाकार घेतल्याने नाशिकची सत्ता मनसेच्या ताब्यात देण्यास शिवसेनेचे उद्धव ठाकरे पुढाकार घेतील, अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या तीन आमदारांना थेट संवाद साधावा लागला होता. मनसेच्या वतीने अशाप्रकारे कोण आमदार उद्धव यांना भेटण्यासाठी पुढाकार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मनसेने सहकार्याची अपेक्षा केल्यानंतरच उद्धव ठाकरे आपले पत्ते उघड करण्याची शक्‍यता असल्याने मनसेचे पदाधिकारी नाशिकसाठी "मातोश्री'च्या दिशेने कधी जाणार, याकडे मनसेच्याच नव्हे तर शिवसेनेच्या नेत्यांचेही लक्ष लागलेले आहे



राज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले!

राज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले!
सिद्धेश्‍वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, March 07, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - 'जनमताचा आदर करीत' ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वांत जास्त जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सशर्त पाठींबा देण्याच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले आहे! राज यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणातील भविष्यकालीन समीकरणे बदलणार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना सत्तापालटासाठी संधी प्राप्त होईल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे.

"याचसाठी केला होता अट्टाहास, मनसेशी मनोमिलन व्हावे' ही भाजपाची भूमिका असली तरी शिवसेना यात अडसर ठरत होती. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्यावरून भाजपचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी "सत्तेसाठी भलत्या सलत्या बिळात शिरू नका' असा सल्ला या नेत्यांना दिला होता. तरीही भाजपचे नेते हिरमुसले नव्हते. भाजपस शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर घरोबा कोणत्याही परिस्थितीत करायचा नव्हता आणि नाही. मात्र मनसेसोबत जेथे शक्‍य होईल तेथे संधान साधता आले तर आपल्या पथ्यावरच पडेल ही आशा भाजपच्या नेत्यांनी सोडली नव्हती. त्यांच्या या आशेला ठाण्यातील वातावरण आणि परिस्थितीने मदत केली. ठाण्यात शिवसेना क्रमांक एकवर असली तरी महापौर पदाचा जादूई आकडा पार करण्यासाठी सेनेला बाहेरच्या रसदीचा गरज होती. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या बरोबरचे "मधूर' संबंध वापरत महायुती-मनसेमधील मनोमिलनामधील अंतर "ठाणे पॅटर्न'च्या निमित्ताने कमी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे "राज ठाकरे यांची आजची भूमिका केवळ एक पाऊल पुढे येण्याची नसून ती झेप आहे', ही बोलकी प्रतिक्रीया भाजपच्या एका नेत्याने व्यक्‍त केली.

मनसेसोबत आघाडी करावी, हा भाजपश्रेष्ठींचा मनसूबा आता गुपित राहिलेला नाही, असे पक्षात बोलले जाते. शिवसेना-भाजपा-रिपाई-मनसे हा चतुष्कोन 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात सत्तापालटासाठी हमखास उपयोगी पडेल याची खात्री भाजपच्या नेत्यांना आहे. शिवसेना, भाजपा आणि मनसे या पक्षांनी आपली बलस्थाने, ताकद ओळखून आघाडीचा सामना केला तर त्याचा फायदा सर्वांनाचा होणार आहे. या अर्थाने हा चतुष्कोन होणे किती गरजेचे आहे, याचे व्यावहारीक गणितही या नेत्याने सांगितले. विधानसभेच्या सुमारे 100 जागांवर मनसेची मते प्रभाव पाडू शकतात. ही वस्तूस्थिती आमच्या जोडीदाराने जाणून घेतली तर "कार्याध्यक्षांना' महायुतीचा आताचा त्रिकोण हा चौकान करण्यात काहीही वावगे वाटणार नाही. तरच राज्यात आघाडी सरकारला आपण खाली खेचू शकतो, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे

ठाण्यात मनसेचा शिवसेनेला पाठिंबा- राज ठाकरे

ठाण्यात मनसेचा शिवसेनेला पाठिंबा- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 06, 2012 AT 01:47 PM (IST)

ठाणे- ठाणे महापौरपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना-भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवेसनेच्या तीन आमदारांनी आज सकाळी आपली भेट घेतल्याचे राज यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, "ठाण्याचा विकास व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा आहे. बाळासाहेबांच्या इच्छेचा आपल्याला आदर आहे. ठाण्यात मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण, ही भविष्यातील युती नसून, हा पाठिंबा म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासाठी नाही. पुण्यात विरोधी पक्षनेता मनसेचा होणार आहे. माझ्या पक्षाला विकासाची कामे करायची आहेत. पक्षाकडे पाहण्याची गरज असल्यामुळे एप्रिलमध्ये ठाणे व नवी मुंबईत पक्षात साफसफाई करणार आहे. या निवडणुकीने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. नाशिकमध्य़े जनादेश माझ्या बाजूने आहे. नाशिकच्या महापौरपदासाठी वेळ पडल्यास विरोध पक्ष म्हणून बसू, पण आपण कोणाच्याही पाया पडणार नाही.