शनिवार, 10 अक्तूबर 2009

NewsX Exclusive: Raj Thackeray unplugged Part-3

NewsX Exclusive: Raj Thackeray unplugged Part-2

NewsX Exclusive: Raj Thackeray unplugged Part-1

कालचे राज साहेबांचे भाषण मला खुपच आवडले ,कारण राज यांनी मराठी बरोबरच बाकी इतर मुद्द्यानाही स्पर्श केला .
उदा . ६० वर्षे झाली आपण त्याच त्याच मुद्द्यावर निवडणुक लढवतोय ,पाणी देऊ , वीज देऊ ,रस्ते करू ,आरोग्य .
गेल्या १० वर्षात कांग्रेस ,राष्ट्रवादी ला १ मेगावॉट वीज ही निर्माण करता येत नाही .आपले हे सरकार करू ,बघू,अहवाल सदर करू ,कमिटी स्थापन करू यातच अडकलेले आहे .हो किंवा नाही मधे यांचे उत्तर नसतेच कधी .मुंबई तिल झोपडया किती दिवस वाढवत राहणार ?अजुन किती दिवस त्या अधिकृत  करत राहणार? झोपड्याच होऊ नयेत याच्यासाठी काही उपाययोजना आहेत का?
शेतकरयाना कर्ज झाले की कर्जमाफी द्यायची (प्रत्यक्षात किती फायदा झाला काय माहित? की सगल्या आमदार ,खासदार ,मंत्री यांनीच पैसे खाल्ले?) पण इतक्या सगल्या आत्महत्या होईपर्यंत सरकार झोपले  होते का?
शेतकरी इतका कर्जबाजारी होऊ नये म्हणुन काय उपाययोजना केल्या ?नुसती कर्जमाफी देऊन काय होणार आहे?
इथे पावसाल्यत बाहेर वीज कडकडली  की घरात वीज गायब . लोकसंख्या वाढली म्हणुन  नुसते रस्ते रुंद करून काय उपयोग आहे? आज एका शहराची १० लाख एवढी आहे म्हणुन रास्ता रुंदीकरण केले पण उदया
शहराची लोकसंख्या २० लाख ज़ल्यावर काय करणार काय घरे तोडून तिथे रस्ता बांधणार का?  या येणार्या लोंध्यन्ना कधे थाम्बवनर? आता नीवडणुका  आल्या की यांना शिवाजी महाराजांची आठवां होतेय जय राज्यात शेतकरी सुखी नाही ,शालेची फी  भरायला  ३०० रुपये   नाही म्हणून एक मुलगी आत्महत्या करते  ,कालच नक्षल्वाद्यानी  १७ पोलिसांना मारले आशा परिस्थितीत अरबी समुद्रात करोडो रुपये खर्चा करून शिवाजी महाराजांचे स्मारक बंधावे ? स्मारक बांधायला विरोध नाही पण खुद्द महाराजनिच सांगितले की आधे रयतेची काळजी घ्यावी मग सगळा पण इथे रयतेचीच काय अवस्था आहे?बाकीच्या देशात वीज गेली की बातमी होते पण इथे वीज आली की बातमी ,इस्राइल ने वाळवांतात शेत करून दाखवली आपले काय?बोला आपले काय?  

गुरुवार, 8 अक्तूबर 2009

मनसेला १२ जागा

मुंबई, १८ ऑक्टोबर
* काँग्रेस आघाडीला १४० जागा, युतीला ११८ तर मनसेला १२ जागा
* स्टार माझा- नेल्सनच्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीचा निष्कर्ष
पुढच्या आठवडय़ात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी १४० जागा जिंकून सत्तेच्या समीप जाईल, असा निष्कर्ष स्टार माझा आणि नेल्सन यांच्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीतून स्पष्टपणे समोर आता आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पारडय़ात ११८ जागा पडतील, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना १२ जागा जिंकण्यात यशस्वी होईल, असेही या चाचणीत दिसून आले आहे. विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये काँग्रेस पक्ष अपेक्षेप्रमाणे मोठी बाजी मारण्याची चिन्हे आहेत. या पाहणीनुसार काँग्रेस पक्षाला तब्बल ८८ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ६३ तर भाजपाला ५५ जागा जिंकून राष्ट्रवादीला मागे टाकल्याचे समाधान मिळू शकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या पाहणीनुसार मनसेला १२ तर रिडालोसला सहा जागा मिळतील. अपक्ष आणि इतरांच्या वाटय़ाला १२ जागा जातील, अशी अपेक्षा आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा प्रभाव ओसरला आहे का, या प्रश्नाला ३८ टक्के मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले. ६२ टक्के मतदारांनी मात्र राज यांची जादू कायम असल्याचे मत नोंदविले. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा महागाईचा असल्याचे आढळून आले असले तरी बहुसंख्य मतदारांनी त्याबद्दल काँग्रेला जबाबदार धरलेले नाही. विशेष म्हणजे, मराठी माणसाची अस्मिता हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत ५४ टक्के  मतदारांनी नोंदविले आहे.                       
(ref loksatta)
तुम्हाला काय वाटते मनसे ला किती जागा भेटतील ? कमेन्ट करा

राज ठाकरे 2 नाशिक

राज ठाकरे 4 नाशिक

राज ठाकरे ३ नाशिक