शुक्रवार, 2 अक्तूबर 2009

raj thakre interview

raj thakre interview

raj thakre 3 ghatkopar

raj thakre 2 ghatkopar

raj thakre 1 ghatkopar

मनसेच्या संकेतस्थळावर सूचनांचा पाऊस!

मनसेच्या संकेतस्थळावर सूचनांचा पाऊस!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 27th, 2009 AT 11:09 PM



मुंबई -  मराठीच्या मुद्द्यावर आग्रही आणि आक्रमक भूमिका मांडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावर जनतेने आपल्या आशाआकांक्षा ई-मेलच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाषाविषयक अस्मिता, रोजगार, शिक्षण, आरक्षण या प्रत्येक मुद्द्याबाबत राज्यातल्याच नाही; तर देश-विदेशांतील अनेक मराठी माणसांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या आहेत. अधिकाधिक तरुणांना आकर्षित करणारा पक्ष अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आता सर्वश्रुत आहेच. त्याचा दाखला खुद्द मनसेच्या वेबसाईटवरील या सूचनांमध्येही मिळतो. हा पक्षाच्या वेबसाईटस्‌पासून पक्षातील कार्यकर्त्यांच्या कपड्यांपर्यंत, पक्षाच्या झेंड्यापासून ते पक्षपरिचयाच्या पुस्तिकेपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याच्याही अनेक रंजक सूचना देशविदेशांतील विद्यार्थ्यांनी पाठवल्या आहेत. मराठी माणसांसाठी झगडणाऱ्या या पक्षाकडे मराठी संस्कृती-परंपरेची वेगळी ओळख सांगणारी "टोपी'देखील कार्यकर्त्यांच्या पेहरावामध्ये हवीच, अशीही आग्रही सूचना येथे केली गेली आहे. नागरी जीवनातील ताणतणाव, नागरी सुविधांवर येणारा अतिरिक्त ताण, पाणी, ऊर्जा, महागाई, प्रशासन व्यवस्थेमधील भ्रष्टाचार याबाबत न्याय मागण्यासाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी आपल्या आग्रही मागण्या नोंदवल्या आहेत. आज शिक्षण, नोकरी-धंद्यानिमित्त शहरांतील अनेक तरुण देश-विदेशामध्ये स्थित आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांना आपल्या भाषेविषयी, येथील मातीविषयी वाटणारी ओढही त्यांनी राज ठाकरे यांना पत्राद्वारे लिहून पाठवली आहे. मनसेची भूमिका आणि त्याविषयी आपले मत नोंदवणाऱ्या मनसेप्रेमींप्रमाणेच मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी दर्शवणाऱ्यांच्याही नापसंतीही येथे व्यक्त होत अस
ते. मुंबई केवळ मराठी माणसांची नसून, ती आमचीदेखील आहे, असा "आपलेपणा' दाखवणाऱ्या ई-मेल्सची संख्याही इथे मोठी आहे; मात्र या "हेट मेल्स'ना येथे टाळले जात नसून त्यांनाही येथे उत्तरे दिली जातात, असे मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी "सकाळ'ला सांगितले. राज्यातील विविध गावांमध्ये असणारे गडकिल्ले, त्यांची परंपरा, त्या गावातील वेगळ्या चालीरीतींची माहिती देणारेही येथे आहेत. निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे मनसेचा दहा कलमी कार्यक्रम काय असावा, असे मोठाले जाहीरनामेही लिहून पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
  

 

On














 

 

 

 

 

 

बुधवार, 30 सितंबर 2009

अवस्था महाराष्ट्राची!

loksatta  agralekh

विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांनी काल माघार घेतल्यानंतर या खेपेचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. आपल्या खास उमेदवारांचे काय होणार, याची चिंता असणाऱ्या नेत्यांना आता प्रचाराची दिशाही सापडणार आहे. आपण आणि आपल्या पक्षाने काय केले, किंवा काय नाही, हे आता उच्च पट्टीत सांगितले जाईल. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यात आपला सिंहाचा वाटा आहे, असाही दावा काही नेत्यांकडून केला जाईल. तो आपण मुकाटपणे ऐकू, पण वस्तुस्थिती तशी नाही. संपूर्ण देशात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यात आपण अग्रभागी कसे राहिलो, याच्या सुरस आणि तितक्याच चमत्कारिक कथा कुणी सांगितल्या तर त्याही आपण ऐकून घ्याव्यात हे उत्तम. महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत खूपच पुढे आहे, हा मात्र अस्सल भ्रम आहे. ‘इंडिया टुडे’ने अलीकडेच या सर्वच राज्यांच्या अवस्थेची वार्षिक पाहणी केली आहे. हा त्या साप्ताहिकाचा सातवा अहवाल आहे. त्यावरून महाराष्ट्र प्रगतीत कितवा त्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. आर्थिक क्रयशक्तीच्या हिशेबात काही वर्षे पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. याही खेपेला त्याने हा क्रमांक टिकवला आहे. तो कायम राहिलच असे नाही, कारण हिमाचल प्रदेशकडून पंजाबचे हे स्थान पटकावले जाईल, अशी शक्यता आहे. पंजाबच्या पहिल्या क्रमांकाविषयीही एका वाचकाने, ‘तुमचे काहीतरी चुकते आहे, परत पडताळणी करून पाहा’ असा त्या नियतकालिकाकडे ‘ई-मेल’द्वारे आग्रह धरला. रोज नऊ तास वीजकपातीला तोंड देणारे राज्य प्रगत असूच शकत नाही, असे त्याचे म्हणणे. वीजकपात सहन करणारे राज्य म्हणून पंजाबचा उल्लेख झाला, तर मग महाराष्ट्राची अवस्था विजेबाबत आणखीनच भयाण आहे. महाराष्ट्रात अनेक कंपन्यांना आता स्वत:च्या जनरेटर्सशिवाय तरणोपाय नसतो. विजेच्या बाबतीत महाराष्ट्राने आपली हतबलता यापूर्वीच स्पष्ट केली आहे. ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडे नुसते नेतृत्व असून चालत नाही, त्याच्याकडे कर्तृत्व असायची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात लहानाची मोठी झालेली माणसे मुंबईत प्रवेश करताच पक्की शहरी कशी बनतात आणि मुंबईकरांची जीवनपद्धती कशी आत्मसात करतात, हे आपण अनुभवत असतो. ही जीवनपद्धतीही फक्त दिखाऊपणापुरतीच मर्यादित असते. मुंबईकरांच्या जगण्यासाठीच्या धडपडीत या नेतृत्वाचा कोणत्याही पातळीवर टिकाव लागणार नाही. मोटारगाडय़ांमधून फिरणे, उंची हॉटेलांमध्ये खाणेपिणे आणि चंगळ करणे या पलीकडे त्यांना जाता येत नाही आणि मग या आरामदायी वातावरणात आपल्या ग्रामीण भावंडांचा त्यांना चांगलाच विसर पडतो. महाराष्ट्रात राजकारण्यांनी उभारलेल्या मोठमोठय़ा शिक्षणसंस्था आहेत. तिथे किती प्रमाणात गोरगरिबांना वा खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय असणाऱ्यांना शिकता येते? तिथे शिकणारे विद्यार्थी बव्हंशी चांगल्या आर्थिक स्तरातले उच्चभ्रू असतात. त्यातही पुन्हा बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणच तिथे जास्त असल्याचे आढळून येते. केरळ हे राज्य साक्षरतेत पहिल्या क्रमांकाचे, तिथल्या शिक्षण संस्थाही नाव घेता येतील अशा, पण हिमाचल प्रदेशने दक्षिणेतल्या केरळचे चांगल्या शिक्षणाबद्दलचे हे स्थान हिसकावून घेतले आहे. शिक्षणाबाबत महाराष्ट्राचे स्थान वरच्या वर्गात कधीही नव्हते, आताही ते नाही. केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्र, देशात तेराव्या स्थानावर आहे. या पाहणीनुसार महाराष्ट्र प्रश्नथमिक शिक्षणात सातव्या क्रमांकावर आहे. राजकारण आणि प्रशासन याबाबतीत या पाहणीनुसार, संपूर्ण देशच जिथे मनोऱ्याच्या अगदी तळाशी आहे, तिथे महाराष्ट्र कुठे आहे ते शोधायलाच हवे. केंद्रीय नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार ११० कोटी लोकसंख्येच्या या देशात ६२ कोटी जनता फार चांगल्या अवस्थेत जगत नाही. सर्वाधिक लोकसंख्येची उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड ही राज्ये वाईट स्थितीत आजही आहेत. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही उत्तरेची चार राज्ये आद्याक्षरी ‘बिमारू’ असली, तरी या आजारपणातून निसटायचा मध्य प्रदेशने निकराचा प्रयत्न केला आहे. मध्य प्रदेश हे राज्य देशाच्या पश्चिम विभागात मोडते. ते गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांच्या गटात कायदा आणि सुव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, हे विशेष. महाराष्ट्राने चार राज्यांच्या गटात चौथा क्रमांक ‘पटकावला’ आहे. गोव्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. शेतीउत्पन्नात महाराष्ट्र हा चौघांच्या गटात तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या अवघ्या दीड टक्के भूभागात पंजाब राज्य आहे. पण देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन तिथे होते, तर गव्हाचीही स्थिती तेवढीच आहे. शेतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. सरकारी कार्यक्रम राबविण्याच्या बाबतीत सगळीकडेच आनंदीआनंद आहे. पंतप्रधानांचा ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रम राबवण्यात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्ये सगळय़ात वाईट म्हणता येतील, अशी आहेत. महाराष्ट्र त्याही बाबतीत मागेच आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची स्थिती त्याहून वाईट आहे. या पाहणीत दिलेले आकडे हे तर शरमेने मान खाली जावी, असे आहेत. या योजनेतून पैसा खर्च करून संपूर्ण देशात अवघ्या १७.४ टक्के घरांना वीज मिळाली, तर ५७.२ टक्के खेडय़ांचे विद्युतीकरण पूर्ण झाले. महाराष्ट्राच्या वाटय़ाला पूर्ण अंधार आहे. ग्रामीण भागात वीजकपातीचे प्रमाण किती भयावह आहे, ते आम्ही वेळोवेळी स्पष्ट केले आहेच. ४८ ते ९६ तास वीजकपात असणाऱ्या खेडय़ांचे प्रतिनिधी नेमके करतात काय, हा प्रश्न पडावा, इतकी ही अवस्था गंभीर आहे. आंध्र प्रदेशाने २२.९१ लाख नवे वीजजोड दिले आणि सर्वच्या सर्व २६ हजार ६३१ खेडय़ांचे १०० टक्के विद्युतीकरण केले. पर्यटनाच्या बाबतीत परदेशी मंडळींना आकृष्ट करणारे एकमेव राज्य म्हणून गोव्याचाच उल्लेख केला जातो, महाराष्ट्राचा नाही. मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण गोव्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. सर्व मूलभूत सोयीसुविधा असणारे राज्य म्हणून गोव्याचा पहिला क्रमांक आहेच, पण सर्वाधिक लोकसंख्येला पर्यटनाच्या आधारे जगवणारे हे राज्य आहे. गोव्याच्या खाणउद्योगातून दरवर्षी चार कोटी टन खनिज उत्पादनाची निर्यात करण्यात येत असते. संपूर्ण भारतात निर्माण होणाऱ्या खनिज उत्पादनाच्या ३० टक्के उत्पादन एकटय़ा गोव्यात होते. गोव्याचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे, हे विशेष! वेगवेगळय़ा केंद्र सरकारी योजनांमधून गेल्या काही वर्षामध्ये सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला. एकटय़ा नगरविकास खात्याने जवाहरलाल नेहरू पुनर्निमाण योजनेअंतर्गत ९५ हजार ३८५ कोटी रुपये खर्च केले असले, तरी प्रत्यक्षात त्याचा विनियोग कसा केला गेला, ते पाहणे गरजेचे आहे. राजीव गांधींनी योजनांवर खर्च होणाऱ्या दर शंभर रुपयांमधले १५ रुपये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, असे म्हटले होते, प्रत्यक्षात हे प्रमाण १५ पैशांच्या घरात असेल, अशी शंका राजरोस घेतली जात आहे. केंद्रीय योजनेतून महाराष्ट्राला जेवढा निधी मिळतो, तेवढा निधी बिहारला मिळाला तर बिहारचे सोने करू, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. महाराष्ट्र हे राज्य शेतीत उत्तम आहे, असा आपल्यापैकी बहुतेकांचा समज बनला असेल तर तो चुकीचा आहे. महाराष्ट्र हा दहा वर्षामध्ये पंधरा वर्षानी मागे गेला, म्हणजेच तो २५ वर्षे मागे आहे. थोडक्यात तो आता १९८४च्या आसपासच रेंगाळतो आहे. सर्व भागाला पिण्याचे पाणी पुरवण्यात केरळ आघाडीवर आहे, तर महाराष्ट्रात आजही हजारो खेडय़ांना (पावसाळय़ात आजही ४०० खेडी आणि वाडय़ा यांना) टँकरने पाणी पुरवायची वेळ येते. आरोग्यातही महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवहारात अग्रेसर आहे. मोटारी, स्वयंचलित दुचाकी वाहने इथे सर्वाधिक खपतात, फक्त रस्ते त्या लायकीचे नसतात. या अहवालाच्या प्रकाशनाच्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सर्वसमावेशक विकास हवा असे म्हटले, तो मात्र कुठेच दिसत नाही. गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मंत्रिमंडळात आपल्याला उत्तम खाते मिळाले, की आपण किती इमले चढवू, असे स्वप्न पाहणाऱ्या सर्वच राजकारण्यांना या ताज्या अहवालाने तडाखा हाणला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी राजकारण्यांचा बुरखा या अहवालाने टरकावला आहे

RAJ THAKRE INTERVIEW 2

RAJ THAKRE INTERVIEW 1

रविवार, 27 सितंबर 2009

raj thakre 6 bhandup prachar sabha

raj thakre 5 bhandup prachar sabha

raj thakre 4 bhandup prachar sabha

Raj thakre 3 bhandup prachar sabha

Raj thakre 2 bhandup prachar sabha

Raj thakre 1 bhandup prachar sabha

सत्तेची किल्ली द्या; राज्यात चमत्कार घडवून दाखवितो - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, September 28th, 2009 AT 12:09 AM


मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एका मोठ्या युद्धाला आपण सर्व जण सामोरे जात आहोत. या वेळी सत्तेची किल्ली माझ्या हातात द्या. मी महाराष्ट्रात चमत्कार घडवून दाखवितो, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मतांचा जोगवा मागायला विविध राजकीय पक्षांचे लोक तुमच्या दारात येतील. शिवसेना-भाजपचे मराठी प्रेमही आता जागे झाले आहे. त्यांचे मराठी मतांवर प्रेम आहे; मराठी माणसांवर नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनी मुंबईतील मराठी टक्का घटविण्याचे काम केले आहे, असा जोरदार हल्ला राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप विभागाच्या वतीने भांडुप विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांची प्रचारसभा भांडुप-पश्‍चिम येथील खडी मशीन मैदानात आज दणक्‍यात झाली. या सभेत राज ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच शिवसेना-भाजप युती यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. खोट्या नावांनी निवडणुकीची ओळखपत्रे, रेशनकार्डे व पॅनकार्डे बनविली जात आहेत. याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. सगळ्यांचेच हात बरबटले आहेत, असा आरोप करीत त्यांनी जनतेसमोर पुरावे सादर करून खळबळ उडवून दिली. उत्तर भारतीयांच्या वाढत्या लोंढ्यांबाबत
टीका करताना राज म्हणाले, ""मुंबईत 227 नगरसेवक आहेत; त्यापैकी 73 नगरसेवक अमराठी आहेत. पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत हा आकडा 150 च्यावर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी महेश जेठमलानी यांनाच मतदान केले ना? त्याआधी संजय निरुपम यांना मांडीवर घेऊन छट्‌पूजा केली, उत्तर प्रदेश दिन साजरे केले. तेव्हा ते त्यांना कसे चालले? मराठी माणसांवरील हे शिवसेना-भाजपचे प्रेम बेगडी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आज मुंबई, महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. उत्तर भारतीय इथे येऊन नोकऱ्या लाटत आहेत. स्वतःचे मतदारसंघ बांधत आहेत. शिवसेना आणि भाजप याविषयी का नाही बोलत? उत्तर भारतातील राज्यकर्ते त्यांना शस्त्राचे परवाने देतात. सुरक्षा रक्षक म्हणून इथे ते लोक रुबाबात नोकरी करतात. मात्र, एकाही मराठी माणसाला इथले सरकार एकही परवाना का देत नाही. त्यांचे कसलेही रेकॉर्ड इथे ठेवले जात नाही. हा या शहराच्या सुरक्षेला मोठा धोका आहे, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
इथल्या राष्ट्रीय पक्षांचे लोक नातेवाइकांना निवडणुकीची तिकिटे देत आहेत. मग पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जायचे कुठे, त्यांनी काय आयुष्यभर सभा-समारंभांत सतरंज्याच टाकायच्या काय? असा सवाल करीत नातेवाइकांना पोसण्यासाठी राजकीय पक्ष काढले असल्याचा टोला राज यांनी लगावला.
राम कदम, सुधाकर चव्हाण यांच्यासह सर्वांनाच दिलेली उमेदवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन दिली असल्याचे ते म्हणाले.
या सभेला मुंबईतील मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी, मंगेश सांगळे, राम कदम, आप्पासाहेब मगरे, सतीश नारकर, तसेच मनसेचे पदाधिकारी भाई माईनकर, सतीश अधिकारी आदी उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभाचे श्रीफळ राज यांनी वाढविले. भांडुपमधील स्थानिक उमेदवार शिशिर शिंदे यांनी निवडून आल्यानंतर भांडुपमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे, तसेच सेवन स्टार हॉटेलमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्‍वासन या वेळी दिले.