गुरुवार, 31 दिसंबर 2009

कृष्ण कुंज'ची सुरक्षा होणार अधिक कडेकोट

कृष्ण कुंज'ची सुरक्षा होणार अधिक कडेकोट
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 01, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडेकोट होणार आहे. त्यांच्या "कृष्ण कुंज' निवासस्थानाच्या कम्पाऊंडच्या भिंतींची उंची वाढविण्याचे काम सध्या जोमाने चालू असून, प्रवेशद्वाराची रचनाही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

राज ठाकरे यांना यापूर्वीही काही वेळा धमकी आली होती. समाजवादी पक्षाचे मध्य प्रदेशमधील माजी आमदार समरिते यांनीही राज ठाकरे यांच्यासाठी एक कोटीची सुपारी दिली होती; तर काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय ब्राह्मण सभेनेही राज ठाकरे यांना थप्पड मारून दाखविणाऱ्यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. तत्पूर्वी मुंबईत मनसेने केलेल्या परप्रांतीयांच्या आंदोलनाच्या वेळी राज यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची मागणी मनसेच्या नवनिर्वाचित आमदारांनी वारंवार विधानसभेत केली होती. त्यानंतर राज यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा झाली होती. या व्यवस्थेमध्ये दोन कार्बाईनधारी पोलिस व एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळाल्यानंतर राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजी पार्क येथील कृष्ण कुंज इमारतीच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याची सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्यामुळे भिंतींच्या पलीकडचे सहज दिसते; पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भिंतींची उंची 12 फुटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सध्याच्या प्रवेशद्वाराची रचनाही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या साध्या गेटऐवजी उंच रेलिंगचे गेट बसविण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे बदल करण्यात आल्याचे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले

सोमवार, 21 दिसंबर 2009

महाराष्ट्र केसरी' बनकरने घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र केसरी' बनकरने घेतली राज ठाकरेंची भेट
-
Sunday, December 20, 2009 AT 01:54 PM (IST)


मुंबई - 'महाराष्ट्र केसरी' हा किताब पटकावलेल्या विजय बनकर याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कुस्तिगीरांना मदत करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असून, 'हिंद केसरी' स्पर्धेसाठी बनकर यांना आवश्‍यक ती आर्थिक मदत देण्याचेही राज यांनी आश्‍वासन दिल्याची माहिती मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली.

राज ठाकरे यांच्या भेटीला बनकर हे चांदीची गदा घेऊनच आले होते. त्यांच्यासोबत खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे होते. त्यांनीच ही भेट घडवून आणली. वांजळे हेही कुस्तीपटू असून विजय बनकर यांच्या वडिलांकडून त्यांनी तालमीत कुस्तीच्या डावपेचांचे प्रशिक्षण घेतले होते.

बनकर यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर त्यांनी आता "हिंद केसरी' कुस्ती स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांनी क्रिकेट आणि अन्य खेळाडू बनण्यापेक्षा कुस्तीपटू व्हावे, त्यामुळे आरोग्यही तंदुरुस्त राहते, असा सल्लाही बनकर यांनी या वेळी दिला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धांसाठी कुस्तिगीरांना मदत करण्यासाठी व त्यांच्यातील होतकरू पैलवानांना पुढे आणण्यासाठी मनसेच्या वतीने ट्रस्ट स्थापन केला जाईल. यासंबंधीची बैठक जानेवारी महिन्यात होईल, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे आमदार वांजळे यांनी सांगितले.

मंगलवार, 15 दिसंबर 2009

स्वतंत्र विदर्भासाठी गरज भासल्यास सार्वमत घ्या - राज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 01:39 PM (IST)

नागपूर - विकासासाठी राज्याचे विभाजन मान्य नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा फेटाळला. विदर्भ वेगळा करायचाच असेल तर त्यासाठी सार्वमत घ्या, अशी मागणी त्यांनी आज टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नक्षलवादावरही त्यांनी मत मांडले.

केंद्र सरकारने तेलंगणा राज्यनिर्मितीस हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला. या मागणीचे इतर पक्षांनी समर्थन केले तर शिवसेनेने विरोध दर्शविला. मनसेची भूमिका मात्र गुलदस्त्यात होती. मनसे आमदार "भूमिका साहेब स्पष्ट करतील' असे सांगत होते. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी आज स्वतंत्र विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शविला. महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना त्याच्या विभाजनाची मागणी योग्य नसल्याचे मत त्यांनी प्रारंभीच मांडले. वेगळ्या राज्याच्या मुद्द्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदविलेले निष्कर्ष पत्रकारांकडून उपस्थित झाल्याचे पाहून त्यांनी "त्यावेळेची स्थिती वेगळी होती. आता बाबासाहेबांना या विषयात उपस्थित करू नका', असे सांगितले. "हा विषय वेगळ्या वळणावर नेऊ नका, तुम्ही माझ्याकडून काहीही वदवून घेऊ शकणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात ज्या पक्षाला भरभरून मते मिळाली, ज्यांचे आमदार, खासदार सर्वाधिक काळ विदर्भातून निवडून आले, त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना या मुद्द्यासाठी धारेवर धरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ठराविक "कोंडाळे'च हे तुणतुणे वाजवत असल्याचे ते म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत असणाऱ्यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा विकास घडविला तो विकास उर्वरित महाराष्ट्रात का झाला नाही, असा प्रश्‍न करून "मतदारांनी डॉक्‍टर बदलविण्याची गरज आहे', असे मत त्यांनी नोंदविले. व्यसनापोटी शेतकरी आत्महत्या करतात, हे मला मान्य नसल्याचे राज म्हणाले. वर्षानुवर्षे होणारा अन्याय, त्यामुळे वैदर्भीयांच्या मनात असलेली खदखद, राग समजून घ्यायचा आहे. येथील ज्वलंत प्रश्‍न समजून त्यावर काय उपाय करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर "विदर्भ विकासाचा अजेंडा' तयार करेन, असे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांमध्ये कोण आहे, त्यांची पाठराखण कोण करीत आहेत, ते समजून घेण्याची आवश्‍यकताही त्यांनी विदित केली. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला केवळ 14 खासदार उपस्थित राहत असतील तर त्यांची संवेदनशीलता लक्षात घ्यावी, असेही राज म्हणाले.

नेते आणि बिल्डरांमधील साटेलोटे उपस्थित करून राज यांना बोलते करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. मात्र, त्यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. विदर्भातच काय, कृष्णा खोरे बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणाले. हे प्रश्‍न वारंवार येत असल्याचे पाहून त्यांनी "तुम्हाला माझ्याकडून अविनाश भोसलें'चे नाव वदवून घ्यायचे आहे काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

चौफेर फलंदाजी
राज यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत आज पत्रकारांना टोलवले. एका प्रश्‍नावर त्यांनी "वाद घालता की प्रश्‍न करता', असा सवाल केला. तर, येथील पत्रकारांना बोलू द्या, उद्या तुमच्याशी मुंबईत बोलेन, अशी गुगली मुंबईच्या पत्रकारांना टाकली. पत्रकार संघाचे मंचावरील प्रतिनिधी प्रश्‍न करीत असल्याचे पाहून "मला चक्क घेरलं तुम्ही', असे म्हणत त्यांनी हशा पिकवला. छायाचित्रकारांना "पुरे आता' म्हणत थांबविले. छोट्या राज्यात कसा मोठा भ्रष्टाचार होतो, त्याचे उदाहरण मधू कोडाच्या रूपातून पाहा, असे सांगून लगेच "हा विनोद होता' अशी पुष्टीही जोडली. बाळासाहेबांचे उत्तर मी कसे देणार, असा प्रतिप्रश्‍न एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल त्यांनी केला. "तुम्हाला धमकी आहे. त्यासाठी बिहारमधून पाच जण आलेत. याबाबत काय,' या प्रश्‍नावर त्यांनी "आता धमकीच्या निमित्तानेही "ते' महाराष्ट्रात येत आहेत' असे म्हणत खसखस पिकवली. हे लिहू नका, असे सांगतानाच त्यांनी "मीडियाला सल्ला दिला म्हणून चौकट छापू नका', अशीही कोटी केली.
विदर्भाचा विकास झाला नसल्याचे मान्य आहे. मात्र, त्याच्या विकासासाठी राज्याचे विभाजन पर्याय ठरू शकत नाही. मेंदूला रक्तस्त्राव होत नाही म्हणून, डॉक्‍टर बदलणे समजण्यासारखे आहे. मात्र, मुंडकेच छाटणे हा उपचार कसा ठरू शकतो?
- राज ठाकरे.

राज ठाकरेंचे विदर्भात उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 02:25 AM (IST)


नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली. दिवसभर ते सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रश्‍नावर ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे आज सकाळी आठ वाजता, शहरात येणार होते. त्यांच्या विमानास तब्बल तासभर उशीर झाला. तोवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळावर जमले होते. घोषणाबाजी करीत होते. राज ठाकरेंचे आगमन होताच, ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी समोर सरकले. तोवर सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना कडे केले. " येणाऱ्या प्रत्येकांना मला भेटू द्या' असा आग्रह राज ठाकरे धरत होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना फुले, पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिस त्यांना ढकलत होते. हा प्रकार बघून प्रशांत पवार पोलिसांवर आक्षरशः धावून गेले. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांच्या डोळ्याला इजा झाली.

सोमवार, 14 दिसंबर 2009

तर "वर्ल्ड कप 2011' प्रदर्शित होऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 12:15 AM (IST)

संतोष भिंगार्डे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी कोणती बाजू किंवा आंदोलने "वर्ल्ड कप 2011'मध्ये दाखविली आहेत, हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट पाहायचा आहे. त्यामध्ये आमच्याविरोधात काही आढळले, तर आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

रवी कपूरने दिग्दर्शित केलेला "वर्ल्ड कप 2011' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यावर रवी पुजारीने गोळीबार का केला, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे रवी पुजारीने अभिनेता व दिग्दर्शक रवी कपूरला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक वाद उफाळून येण्याची दाट शक्‍यता आहे. या चित्रपटात मनसेची आंदोलने दाखविण्यात आली आहेत.

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलने प्रथमच रुपेरी पडद्यावर' अशा प्रकारची बातमी "सकाळ'ने याआधीच प्रसिद्ध केली आहे; मात्र ही आंदोलने कशा पद्धतीने किंवा कशासाठी दाखविण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यावरून आता मोठा संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. याबाबत मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, ""हा चित्रपट आमच्याविरोधात आहे, असे आम्ही ऐकले आहे. टीव्हीवरील प्रोमोज, तसेच चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांनी आम्हाला ही माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट आम्हाला आता पाहायचा आहे. चित्रपटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काही भलतेसलते आरोप केलेले असतील किंवा आमच्या आंदोलनांबाबत काही वेगळेच भाष्य केलेले असेल, तर आम्ही त्याची गंभीर दखल घेणार आहोत. हा चित्रपट महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही.''

दिग्दर्शक रवी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""आम्ही त्यांना चित्रपट दाखविण्यास तयार आहोत. ते आमचे राजा आहेत आणि प्रजा कधीही राजाला दुखवीत नसते. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली आहे.''

रविवार, 13 दिसंबर 2009

विदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रणांगणात!

नागपूर, १३ डिसेंबर
स्वतंत्र तेलंगणाच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भात घोषणा दिल्या जात आहेत. विदर्भातील प्रश्नांना केवळ वाचाच फुटावी म्हणून नव्हे, तर ते सुटावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या मंगळवारी नागपूरच्या रणांगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या नागपुरातील आगमनामुळे थंड पडलेल्या विधानसभा अधिवेशनात जान येणार असून राज यांच्या स्वागताची जय्यत तयारी विदर्भातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरील मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत.
राज्यात शिवसेना-भाजप युती गेले दोन दशकांहून अधिक काळ असून हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर मात्र दोन टोकांवर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून सेनेतून फुटून स्वत:चा पक्ष काढलेल्या राज ठाकरे हे त्यांच्या काकांप्रमाणेच अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की, तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भाची पाठराखण करणार, याचा उलगडा होणार आहे. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, कापूस माफियांचा प्रश्न, नक्षलवादी कारवाया, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सोयाबीन, धान या विदर्भाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरून ते सरकारवर तुटून पडतील, असे संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले असून १२ व्या विधानसभा अधिवेशनात शपथविधीच्या वेळी मुंबईत मनसेच्या आमदारांनी सपाचे आमदार अबू आझमी यांना दिलेल्या झटक्यापासून मनसेची व राज ठाकरे यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. अबू आझमी यांना कानफटात मारल्यामुळे तसेच, गोंधळ घातल्यामुळे मनसेच्या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना विधानसभेच्या आवारातही प्रवेश करण्यास बंदी घातली असून राज ठाकरे यांच्यासमवेत रमेश वांजळे, वसंत गिते, राम कदम आणि शिशिर शिंदे हे चारही आमदार उपस्थित राहणार आहेत. यातील शिशिर शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ न घेतल्यामुळे वैधानिक पेचप्रसंग निर्माण झाला असून त्यांना शपथ द्यावयाची झाल्यास विधानसभेत शपथविधी पुरता प्रवेश देण्याचा ठरावा मांडावा लागणार आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत मनसेचे नऊ आमदार किल्ला लढवत आहेत. विदर्भात अधिवेशन घेण्यामागे येथील प्रश्न सुटणे, ही प्रमुख भूमिका असूनही विदर्भाच्या तोंडाला कायमच सरकारकडून पाने पुसली जात असल्याचा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
नक्षलवाद्यांचा प्रश्न हा केवळ गडचिरोली व चंद्रपूर पुरता मर्यादित राहिलेला नसून तो केव्हाही नागपूपर्यंत येऊन ठेपेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूरमध्येच मुक्काम ठोकतात. त्यांनी गडचिरोलीमध्ये जाणे आवश्यक आहे, तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक दिवस तरी गडचिरोलीत मुक्काम करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान बाळा नांदगावकर यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात नक्षलवाद्यांकडून ५२ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली असून या शहिदांच्या विधवांना निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न राज ठाकरे उचलून धरणार असून गोसीखुर्द, बेंबळ तसेच, उध्र्व वर्धा प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शेतक ऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून राज ठाकरे हे सरकारला जाब विचारणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गेल्या पाच वर्षात सात हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासन व पंतप्रधान पॅकेजमधील मदतीनंतरही शेतकरी आत्महत्या का करत आहेत तसेच, या पॅकेजमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.
विमानतळापासून राज यांची भव्य रॅली निघणार असून विधानभवनाच्या प्रांगणातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हिवाळी अधिवेशनातील मोठा मोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात राज यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले असले तरी नागपूरमधील लोक राज यांनी शिवसेनेत असताना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून १९९३ साली काढलेल्या मोर्चाचीच आठवण आजही काढतात. १९९३ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज यांनी बेरोजगार व विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. नागपूरच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा मोर्चा आदिवासी गोवारींचा होता. त्यात सुमारे ३० हजार गोवारी सहभागी झाले होते. त्यानंतरचा मोठा मोर्चा राज ठाकरे यांचा होता. तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंच्या मोर्चापेक्षा मोठा मोर्चा निघालेला नाही.
(
संदीप आचार्य)

सोमवार, 7 दिसंबर 2009

अबू आझमी हा विषय संपला - नांदगावकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, December 07, 2009 AT 02:04 PM (IST)

नागपूर - अबू आझमी हा विषय संपलेला आहे असे सांगून मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी आझमीप्रकरण बंद करा अशी विनंती केली. विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. अधिवेशन गाजविण्यासाठी मनसेचे आमदार अभ्यास करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

श्री. नांदगावकर म्हणाले, पत्रकार परिषद घेऊन आझमी हिरो बनायला निघाले आहेत. त्यांना सांगायचे तेवढे सांगितले गेले आहे. आता तो विषय बंद झाला आहे. तेच ते करण्यापेक्षा राज्यात जनतेचे इतरही प्रश्‍न आहेत ते मांडू. मनसे आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षांनी सहकार्याचे आश्‍वासन दिले. सभागृह यावर निर्णय घेईल तेव्हा त्यांच्याकडूनही अपेक्षा राहील. मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. पक्षाचे स्वत:चे अस्तित्व आहे. ते दाखविण्यासाठी पक्षाचे आमदार पूर्ण तयारीनिशी आले आहेत. नवीन टिमला अभ्यासासाठी विषय दिले आहेत. ते तयार होत आहे. सभागृहात याची झलक बघायला मिळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

मुंबईतील अधिवेशनाप्रमाणे मनसेचे आमदार हे अधिवेशनही गाजवतील. सभागृहात आणि बाहेरही आक्रमक राहतील. सबंध राज्याचा पिण्याचा प्रश्‍न आहे. विदर्भातील प्रश्‍न आहे. महागाई आहे. स्थगन, लक्षवेधी आदी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. केवळ आझमीत बुडून राहण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवार, 20 नवंबर 2009

शिवसेनेच्या मांडवात राज ठाकरेंचाच बोलबाला

सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 02:10 PM (IST)


ठाणे - ते येणार आहेत... ते नक्की येणार आहेत, अशा कुजबुजीला अखेर नऊच्या सुमारास विराम मिळाला. सुटाबुटातील राज ठाकरे यांचे आगमन झाल्यावर ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकून निघून गेले, असा अनुभव उपस्थित बहुतांश लोकांना आला. "शिवसेनेच्या मांडवात मनसेचाच बोलबोला' अशी स्थिती कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्या भावाच्या लग्नमंडपात पाहावयास मिळाली.

आनंद परांजपे यांचे बंधू अमोल यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा घोडबंदर रोड येथील सुरज वॉटर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनंत तरे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार संजीव नाईक, संजय दिना पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे बाळकृष्ण पुर्णेकर, मनोज शिंदे, नारायण पवार आदींनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व नेत्यांमध्ये लग्नात सातत्याने चर्चा सुरू होती ती राज ठाकरे यांच्या आगमनाची. आनंद परांजपे यांनी त्यांची आई सुप्रिया परांजपे व भाऊ अमोल यांच्या आग्रहावरून राज ठाकरे यांना "कृष्णकुंज'वर जाऊन सोमवारी लग्नाची पत्रिका दिली. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना व मनसेमध्ये कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कटुता आत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही आली आहे. अशा वातावरणात शिवसेनेच्या खासदारांनी थेट राज ठाकरे यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता; मात्र दिवगंत खासदार प्रकाश परांजपे यांची विचारपूस शेवटपर्यंत राज ठाकरे यांनी केल्याचे स्मरण परांजपे कुटुंबीयांनी यानिमित्ताने करून दिले. अगदी शेवटच्या काळातही परांजपे यांना भेटून त्यांनी धीर दिला होता. या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच राज यांना लग्नाला बोलाविण्यात आले. राज यांनीही हे नाते जपत शिवसेनेचे खासदार असूनही परांजपे यांच्या बंधूच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना उपस्थितांचा एकच गराडा पडला. लहान-थोर मंडळींनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन झाल्यावर पुन्हा एकदा त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. या वेळी एकेकाळी भाविसेमध्ये राज यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व आता ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले नेते नरेश म्हस्के यांनी राज यांना "ज्यूस' पिण्याचा आग्रह केला; पण पुढील कार्यक्रमांमुळे थोडा वेळ थांबून राज निघून गेले. शिवसेना खासदाराच्या भावाच्या लग्नातील राज यांची उपस्थिती केवळ उपस्थित शेकडो शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरली होती.

---------------------------------------------
राज-संजय राऊत यांची अखेर गाठ पडली
राज ठाकरे यांच्या आगमनाच्या पंधरा मिनिटे आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत मंडपात पोचले. ते व्हीव्हीआयपी दालनात भोजन घेत असतानाच राज ठाकरेंचे आगमन झाले. ते वर-वधूंना शुभेच्छा देत असतानाच एलसीडी स्क्रीनवर हा शुभेच्छा सोहळा पाहत संजय राऊतांनी भोजन आटोपते घेतले. व्हीव्हीआयपी दालनात राज ठाकरे काही वेळ थांबण्याची अपेक्षा होती; मात्र ते लगेचच निघाल्याने संजय राऊत व त्यांची गाठ पडलीच. "काय कसे काय? बरे आहे ना?' असे म्हणून दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले.

पुढच्या वर्षी राज ठाकरेंशी मराठीत बोलेन : आझमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 06:04 AM (IST)


मुंबई - पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मराठीत चर्चा करण्यासाठी नक्कीच सहभागी होऊ, असा विश्‍वास समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केला. मनसेच्या आमदारांनी विधानसभेत आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेण्याला विरोध करीत त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर या विषयावरून बराच वादविवाद झाला होता.

मराठीचे शिक्षण घेण्यासाठी आझमी यांनी सध्या एका शिक्षकाकडे शिकवणी लावली आहे. रोज सुमारे तासभर ते मराठीचे धडे गिरवित असतात. वर्षभरातील शिकवणीनंतर पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर मी राज ठाकरेंबरोबर मराठीत चर्चा करेन, असे त्यांनी सांगितले.

पाच वर्षांपूर्वीही मी मराठीची शिकवणी लावली होती. मात्र, त्यानंतर मी लोकसभेत निवडून गेल्यामुळे मराठी शिकलो नाही. आता मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठीतच बोलले पाहिजे, याची मला जाणीव झाली आहे, असे त्यांनी सांगितले

बुधवार, 18 नवंबर 2009

भांडण राजने सुरू केले; मी हिंदीतच बोलणार - आझमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 09:57 PM (IST)

लखनौ - "महाराष्ट्राच्या विधानसभेत मी हिंदीतच बोलणार, कोणाच्या धमकावण्याने घाबरून मी भाषा बदलणार नाही,'' असा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी मंगळवारी मनसेला उद्देशून दिला.

विधानसभेत हिंदीतून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे उत्तर प्रदेशात "हीरो' बनविण्यात आलेले आझमी यांचा पक्षाने सत्कार केला. त्याला उत्तर देताना आझमी यांनी वरील इशारा दिला. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमरसिंह यांनी आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून समोर आणण्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने दिले. "राज ठाकरे यांच्या आमदारांना मी तेथेच प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र मुलायमसिंह यांची शिकवण आणि संस्कारांनी मला रोखले,'' असेही आझमी म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीतून शपथ घेऊन परतलेले आझमी यांचे येथे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुलायमसिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. "मराठी येत नाही तर काय करू? जगण्यासाठी रोजगार मिळवू, की शाळेत जाऊन शिकू,' असे ते म्हणाले.
दरम्यान, आझमींना महाराष्ट्रात येऊन बोलू तर देत, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले.

"अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू,' अशी प्रतिक्रिया "मनसे'चे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

सारे काही व्होट बॅंकेसाठी - शिंदे
शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, "आझमी दोन जागांवर निवडून आले आहेत, त्यांपैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.''

"मुलायमसिंह हेच देशातील मुस्लिमांचे खरे मसीहा आहेत,' असे प्रतिपादनही आझमी यांनी लखनौमधील सत्काराला उत्तर देताना केले. आझमी यांनी या वेळी पक्षातून बाहेर पडलेल्या आझम खान यांच्यावरही जोरदार टीका केली.

"मनसे' आमदारांना प्रत्युत्तर न देता महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार केल्याबद्दल अमरसिंह यांनी या वेळी आझमी यांचे कौतुक केले. या प्रकरणामुळे आझमी जनतेच्या नजरेत "हीरो' बनल्याचे ते म्हणाले, तर राष्ट्रभाषेबद्दल दाखवलेल्या सन्मानाबद्दल आझमी यांचे लखनौसह उत्तर प्रदेशातील इतर पाच शहरांमध्येही भव्य सत्कार करण्याची घोषणा मुलायमसिंह यांनी केली. खासदार जया बच्चन यांची उपस्थिती या वेळी विशेष लक्ष वेधत होती, तर खासदार जयाप्रदा यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली.

अमरसिंह यांचा पक्षावर वाढता प्रभाव; तसेच मुलायमसिंह यांनी भाजप बंडखोर कल्याणसिंह यांच्याशी केलेल्या सलोख्यामुळे दुखावलेले मुस्लिम नेते आझम खान पक्षातून बाहेर पडले होते. बाबरी मशीद विध्वंसाला कल्याणसिंहच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून पुढे आणण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यातच हिंदीतून शपथ घेण्याच्या प्रकरणावरून "मनसे'ने केलेल्या गदारोळामुळे आझमी यांचे पक्षातील वजन आणखी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Free Counter
Free Counter


मंगलवार, 17 नवंबर 2009

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 11:45 PM (IST)

मुंबई - अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदी भाषा आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची आव्हानात्मक भाषा आझमी यांनी लखनौमध्ये केली. यासंदर्भात आमदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आझमी दोन जागेवर निवडून आले आहेत, त्यापैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.

रविवार, 15 नवंबर 2009

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 02:27 PM (IST)

मुंबई - घसघशीत ४२१ कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आलेली दादर येथील "कोहिनूर' मिलची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पार्टनरनी विकली आहे. आर्थिक मंदीमुळे ही जमीन विकत असल्याचे कारण राज यांच्या "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने सांगितले आहे. तरीही मंदीच्या काळात या जागेला ६२९ कोटी रुपये इतका भाव आला आहे. जमिनीच्या व्यवहारात संबंधितांचे उखळ पांढरे झाले असले, तरी या जागेवर उभ्या राहणाऱ्या मॉलमध्ये रोजगार मिळण्याचे मराठी तरुणांचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे. येत्या काळात या जागेवर व्यावसायिक संकुल उभे राहणार असून त्यामध्ये तरी मराठी तरुणांना रोजगार मिळेल काय, असा सवाल आता केला जात आहे.

राज ठाकरे हे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे संचालक असून त्यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर हे या कंपनीचे चेअरमन आहेत. "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने २००५ मध्ये कोहिनूर मिलची दादर येथील जागा खरेदी केली होती. या व्यवहारात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा "कोहिनूर ग्रुप' आणि "इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस' ही कंपनी राज यांचे भागीदार होते. शिवसेना भवनसमोरच असलेली कोहिनूर मिल क्रमांक तीनची ही सुमारे पाच एकर जागा तेव्हा ४२१ कोटींना विकत घेण्यात आली होती. एकापाठोपाठ एक गिरण्या बंद पडत असताना धनदांडगे या जागा विकत घेऊन गिरणी कामगारांना रस्त्यावर आणत असल्याची टीका सुरू असतानाच्या काळात या जागेचे व्यवहार झाले होते.

राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत होते. या जागेसाठी राज यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल केला जात होता. त्या वेळी राज व त्यांच्या पार्टनरनी बॅंकेतून कर्ज काढल्याचा दाखला दिला होता. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी राज यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करून पाठराखण केली होती. राज यांनीही तेव्हा या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांत मराठी तरुणांनाच प्राधान्य मिळेल असे वक्तव्य केले होते.

शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी मोक्‍याच्या जागेवर असलेल्या या जमिनीवर "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर' कंपनी मॉल बांधणार होती. त्यादृष्टीने मॉलच्या तळघराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र आर्थिक मंदीमुळे मॉलमधील दुकानांना मिळणारा ६०० रुपये प्रति चौरस फुटांचा भाव २०० रुपयांपर्यंत खाली उतरला. मंदीत होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे कंपनीने ही जागा तेथील बांधकामासह सहा महिन्यांपूर्वी विकल्याचे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे राजन शिरोडकर यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी ४२१ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे १०५० कोटींवर पोचते; मात्र मंदीमुळे ६२९ कोटी रुपयांना ती विकण्यात आली आहे. जमीनविक्रीनंतर तिन्ही पार्टनरना प्रत्येकी ६२ कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे राजन शिरोडकर यांनी सांगितले. आर्थिक मंदीमुळे जमिनीला ६२९ कोटी रुपये भाव आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा व्यवहार त्यापेक्षाही जास्त रकमेने झाला असावा, अशी शक्‍यता रिअल मार्केटमध्ये व्यक्त केली जात आहे.

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 14, 2009 AT 11:53 PM (IST)


मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या पदांवर मराठी भाषक तरुणांनाच नोकरी देण्यात यावी, परप्रांतीयांची निवड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. 'मनसे' विरोधात आता शिवसेना उतरली असून मनसेनं गोंधळ घातल्यास शिवसेना दादर, बांद्रा, पार्ल्यात सुरक्षा देणार आहे.

आज (रविवार) होणाऱ्या बॅंकेच्या भरती परीक्षेसाठी परप्रांतीय उमेदवारही येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात येणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांना अतिरिक्त कुमकही पुरविण्यात आली आहे.

शनिवार, 14 नवंबर 2009

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 12:00 AM (IST)


ठाणे - निवडणुका जिंकण्यासाठी मराठी माणसाचा प्रभाव पडत नाही, तर दुसऱ्या मराठी माणसाला पाडण्यासाठीच त्याचा प्रभाव पडतो. निवडून येण्याच्या गुणवत्तेवर मराठी माणसाचा प्रभाव नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही मराठी माणसासाठी "पाडवणूकच' ठरते. हे अगदी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून होत आले आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.

अर्थ फाऊंडेशन आयोजित नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेत "निवडणुका आणि मराठी मानसिकता' या विषयावर श्री. राऊत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राजकीय विश्‍लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी भूषविले.

या वेळी श्री. राऊत म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक अस्मिता असणे स्वाभाविक आहे व आवश्‍यकही आहे; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणूस "मराठी' म्हणून मतदान करीत नाही. आज मुंबईत 19 अमराठी आमदार निवडून आले आहेत. इतर भाषक आमदारांना विरोध नाही, हे सांगत दररोज सुमारे 350 कुटुंबे महाराष्ट्रात येतात, असेही त्यांनी नमूद केले; पण अशीच जर परिस्थिती राहिली तर 2014 मध्ये होणारी लोकसभा व राज्यसभा निवडणूक ही मुंबईसह महाराष्ट्राची शेवटची निवडणूक ठरण्याची शक्‍यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, मराठी माणसाच्या पीछेहाटीचे आणखी एक कारण म्हणजे आपली मराठी माणसाचा आर्थिक कमकुवतपणा. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातून मुंबई जर वेगळी केली तर ओरिसा, छत्तीसगड अशा राज्यांबरोबर आपण येतो. "आपण नोकरीत पडतो व धंद्यात पडतो' अशीच आपली मानसिकता आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर दिल्लीत मराठी माणसाला अनेक मानाची पदे मिळाली; पण नेतृत्व व मानाची पदे यात फरक आहे. आज महाराष्ट्रातून प्रत्येक स्तरावर राष्ट्रीय नेतृत्व घडविण्याची गरज आहे. समाज दुर्बल झाला की त्याचे प्रतिनिधित्व करणारी भाषाही दुर्बल होते. आज मराठी समाजाची उन्नती आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व मराठी माणसांनी मराठी म्हणून मतदान करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बुधवार, 11 नवंबर 2009

ram kadam 2



ram kadam 3

सोमवार, 9 नवंबर 2009

विधानसभेत अ'राज'क; मनसेचे चौघे निलंबित

विधानसभेत अ'राज'क; मनसेचे चौघे निलंबित
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 09, 2009 AT 01:57 PM (IST)

मुंबई - महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नव्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी धुमाकूळ घालत लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व पक्षांच्या सदस्यांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा जपण्यासाठी "मनसे'च्या चार सदस्यांना निलबंनाची शिक्षा केली.

विधानसभा सदस्यत्वाची हिंदीतून शपथ घेणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू असीम आझमी यांना "मनसे'च्या सदस्यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राज्याच्या काही शहरांमध्ये हिंसाचाराच्या रूपाने विधिमंडळातील घटनेचे पडसाद उमटले.

अशोभनीय वर्तन आणि सभागृहाचा अवमान केल्याबद्दल शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वांजळे आणि वसंत गिते या सदस्यांना हंगामी अध्यक्ष गणपतराव देशमुख यांनी चार वर्षांसाठी निलंबित केले. मुंबई आणि नागपूर विधान भवनांच्या परिसरात प्रवेश करण्यासही या चौघांना मनाई करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या अधिवेशनात भाषेवरून एखाद्या सदस्याला मारहाण करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. विधानसभेतील या घटनेचे पडसाद राज्यात विविध भागांत उमटले. भिवंडीत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. ठाणे, भिवंडी आणि नाशिक येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली असून, त्याचा सभागृहात तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

विधानसभेवर निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. ज्येष्ठ सदस्य मंत्री, माजी मंत्री या क्रमाने शपथविधी पार पडल्यानंतर सदस्यांना शपथ देण्याचे काम सुरू झाले. या निवडणुकीत "मनसे'चे 13 आमदार निवडून आले आहेत. प्रत्येक सदस्याने मराठीतूनच शपथ घेतली पाहिजे, असा आग्रह "मनसे'ने पहिल्यापासून धरला होता. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी त्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला; परंतु अध्यक्षांनी त्यास नकार दिला. शपथ घेतल्याशिवाय कोणत्याही सदस्याला बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि सदस्यांचा शपथविधी सुरू ठेवला.

अबू आझमी शपथ घेण्यासाठी अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला असलेल्या पोडियमजवळ गेले. त्यांनी हिंदीतून शपथ घेण्यास सुरवात करताच, "मनसे'चे रमेश वांजळे आझमी यांच्या दिशेने धावले आणि त्यांचे पोडियम खेचून खाली घेतले. त्यांच्यापाठोपाठ मनसेचे अन्य सदस्य मराठीतच शपथ घेतली पाहिजे, असे फलक फडकवीत वेलमध्ये धावले आणि एकच गोंधळ उडाला. त्या वेळी आझमी यांच्या मदतीला पहिल्यांदा धावल्या त्या "शेकाप'च्या सदस्या मीनाक्षी पाटील. त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आझमी यांना घेरून, त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपचे सदस्य मात्र जागेवर उभे होते. "मनसे'च्या सदस्यांनी श्रीमती पाटील यांच्या अंगावर कापडी फलक भिरकावले. काही क्षण वातावरण अतिशय स्फोटक झाले. श्रीमती पाटील आझमी यांना अध्यक्षांजवळ घेऊन गेल्या आणि तिथे त्यांना शपथ घ्यायला लावली. त्या वेळीही त्यांनी हिंदीतूनच शपथ घेतली. अध्यक्षांशी हस्तांदोलन करून विरोधी सदस्यांच्या बाजूने आपल्या आसनाकडे जात असतानाच, शिशिर शिंदे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर वांजळे, कदम, गिते हे सदस्य वेलमध्ये आले आणि त्यांना धक्काबुक्की करू लागले. आझमी यांना लाथाबुक्‍यांनी मारण्यात आले. एकाने त्यांना थप्पड मारली, त्या वेळी जलसंपदामंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते; तसेच सत्ताधारी सदस्यही आझमी यांच्या बचावासाठी धावून गेले. सभागृहात रणकंदन सुरू झाले. त्या वेळी अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी "मनसे'च्या आमदारांनी अबू आझमी यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली; त्याला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी तळ्यात-मळ्यात भूमिका घेतल्याने शिवसेनेचा या प्रश्‍नावर गोंधळ उडाल्याचे चित्र दिसले.
सभागृहातील 246 सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा सदस्यांना मारहाण करणारे आणि सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग करणारे मनसेचे शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वांजळे व वसंत गिते यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला. सत्ताधारी सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्यात आला. त्या वेळी शिवसेना व भाजपचे सदस्य जागेवर बसून होते. त्यानंतर अध्यक्ष देशमुख यांनी या चार सदस्यांना पुढील चार वर्षे निलंबित करण्यात येत असल्याचे; तसेच त्यांना मुंबई व नागपूरच्या विधान भवन परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

mns vidhansabha

हिंदीतून शपथ घेणाऱ्या आझमींना मनसेचा 'धक्का'

हिंदीतून शपथ घेणाऱ्या आझमींना मनसेचा 'धक्का'
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 09, 2009 AT 02:57 AM (IST)


मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतल्यामुळे विधानसभेत सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आणि आझमी यांच्यात जुंपली. खडकवासला मतदारसंघाचे मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी आझमी यांच्यापुढील माईक उखडून फेकण्याचा प्रयत्न केला. आझमी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकारानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आझमी यांनी हिंदीतून शपथ घेण्यास सुरवात केल्यानंतर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत त्याला विरोध केला. मात्र, सभापती गणपतराव देशमुख यांनी त्याला विरोध केला.

रविवार, 8 नवंबर 2009

मराठीतून शपथ घ्या-राज ठाकरेंचे आमदारांना पत्र

मराठीतून शपथ घ्या-राज ठाकरेंचे आमदारांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 09, 2009 AT 12:44 AM (IST)

मुंबई - मराठी संस्कृतीचा आदर राखण्यासाठी राज्यातील आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व २८८ आमदारांना पाठविले आहे. राज्यातील नवनिर्वाचित आमदार सोमवारी आणि मंगळवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहेत. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

मनसेचा गटनेता निवड करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे सर्व आमदार मराठीतच शपथ घेतील, असे सांगितले होते. त्याचवेळी जो आमदार मराठीतून शपथ घेणार नाही, त्याला आमचे आमदार योग्य उत्तर देतील, असेही त्यांनी बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Free Counter
Free Counter

सोमवार, 2 नवंबर 2009

raj thakre 2/11/09

खातेवाटपासाठीची रस्सीखेच दुर्दैवी - राज ठाकरे

खातेवाटपासाठीची रस्सीखेच दुर्दैवी - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 02nd, 2009 AT 1:11 PM
..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.

मुंबई - राज्यातील जनता महागाईने होरपळत असताना केवळ मंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच दुर्दैवी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. बाळा नांदगावकर यांची विधिमंडळातील पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. उपगटनेतेपदी वसंत गिते यांची, तर पक्षप्रतोदपदी नितीन सरदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
विधानसभेत प्रत्येक आमदाराला मराठीतूनच शपथ घ्यावी लागेल, जो आमदार मराठीतून शपथ घेणार नाही, त्यांना मनसेचे विधानसभेतील शिलेदार त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकात कन्नड येत नाही, म्हणून एका आमदाराला मंत्रीपद गमवावे लागले होते, हे सांगत हाच कडवटपणा येथेही दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मनसेवर जो विश्‍वास दाखविला. तो मनसेचे आमदार सार्थ ठरवतील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

रविवार, 1 नवंबर 2009

राज ठाकरे यांचे आज ‘टीम मनसे’ला ‘कोचिंग’ : मनसे विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकर यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

राज ठाकरे यांचे आज ‘टीम मनसे’ला ‘कोचिंग’ : मनसे विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकर यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब 
संदीप आचार्य
मुंबई, १ नोव्हेंबर
स्पष्ट बहुमत मिळूनही खातेवाटपावरून सरकार स्थापनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुरू असलेला घोळ आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेतील कामकाज पत्रिका हिंदूीतून मिळण्याची केलेली मागणी या दोन मुद्दय़ांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित असणारी भूमिका म्हणजेच विधानसभा डोक्यावर घेण्याचे काम मनसेचे १३ शिलेदार करणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. त्याचप्रमाणे उद्या राज यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी होणाऱ्या मनसे आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागी विजय मिळविल्यानंतर मनसेविषयी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीतील घणाघाती भाषणे, निवडणुकीनिमित्त जाहीरनामा किंवा वचननामा न देता जाहीर केलेला ‘वचक’नामा या पाश्र्वभूमीवर राज यांच्या १३ शिलेदारांच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहणार आहे. मनसेचे आमदार जर विधानसभेत अभ्यासपूर्ण दरारा निर्माण करू शकले नाहीत तर त्याचा परिणाम आगामी काळात मनसेवर निश्चितपणे होऊ शकतो. या साऱ्याची जाणीव बाळगून कृष्णभुवन या निवासस्थानी उद्या राज ठाकरे यांनी मनसेच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत गटनेता, उपनेता, प्रतोद आदींची निवड करण्यात येणार आहे. गेली पंधरा वर्षे आमदार असलेले बाळा नांदगावकर यांची नेतेपदी निवड निश्चित मानण्यात येत असून उपनेतेपदी शिशिर शिंदे यांची निवड केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसेच्या १३ आमदारांपैकी के वळ बाळा नांदगावकर यांना विधानसभेच्या कामकाजाचा पूर्वानुभव आहे तर शिशिर शिंदे यांनी यापूर्वी विधानपरिषद सदस्य म्हणून काम केले आहे. नाशिकचे उत्तमराव ढिकले हे खासदार होते तर वसंत गिते यांनी नाशिकचे महापौरपद भुषविले आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या आमदारांच्या टीमकडून विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामाची अपेक्षा राज ठाकरे बाळगून आहेत. यासाठी उद्याच्या बैठकीत राज यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात वीज, पाणी, बेरोजगारी यासह दिलेली विविध आश्वासने पूर्ण करायला लावण्यासाठी मनसेचे आमदार विधानसभेत आक्रमक राहणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील उद्योग-व्यवसायात मराठी माणसांना शंभर टक्के नोकऱ्या मिळाव्या यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांची सरकारवरील पकड घट्ट असणार आहे तर भाजपच्या एकनाथ खडसे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद जाणार असल्यामुळे विरोधी पक्षही सक्षम होणार आहे. भाजपकडे अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असून मनसेच्या आमदारांना एकाचवेळी सरकार व विरोधीपक्षात राहून सेना-भाजपशी ‘सामना’ करावा लागणार आहे. अबू आझमी यांच्या हिंदी भाषेतून कार्यक्रपत्रिका देण्याच्या मागणीवर राज यांनी आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केली असल्यामुळे नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात मनसेचा झटका पहायला मिळणार आहे. मनसेच्या नव्या आमदारांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेऊन प्रभावी कामकाज करण्यासाठी सर्व आयुधांचा कशा प्रकारे वापर करायचा यावरही उद्या मार्गदर्शन होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसेच्या १३ आमदारांनी राज्यातील विविध प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडावी यासाठी आमदारांचे अभ्यासगटही बनविण्यात येणार आहेत. भविष्यात विदर्भ, मराठवाडय़ातही मनसेला वाढण्यास मोठा वाव असल्यामुळे तेथील प्रश्न विधानसभेत मोठय़ा प्रमाणात उपस्थित करण्यात येणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याची झलक पहावयास मिळेल असा विश्वास मनसेच्या सूत्रांनी व्यक्त केला. विधेयके, तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय ठराव, कपात सूचना, शून्य प्रहरातील औचित्याचे मुद्दे, विविध विषयांवरील चर्चा अशा विविध आयुधांचा वापर मनसेच्या आमदारांकडून अपेक्षित असून या आयुधांचा प्रभावी वापर करून राज यांना अपेक्षित असलेली विधानसभा डोक्यावर घेतील.

शुक्रवार, 30 अक्तूबर 2009

हिंदी हवे तर अबू आझमीने युपीत चालते व्हावे -राज

l
मुंबई, ३० ऑक्टोबर / प्रतिनिधी
राज ठाकरे यांच्या मनसेच्या बाजूने बहुतांश मुंबईकर मराठी जनता उभी राहण्यामागे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा उद्दामपणा कारणीभूत ठरला होता. उत्तर भारतीयांच्या रक्षणासाठी आम्ही लाठय़ा वाटू, अशी आव्हानयुक्त भाषा आझमी यांनी वापरल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून उत्तर भारतीय टॅक्सीचालकांवर हल्लाबोल केला होता.
या साऱ्या घटना अद्याप मराठीजनांच्या विस्मृतीत गेलेल्या नसतानाच आता भिवंडी व मानखूर्द-शिवाजीनगर या दोन ठिकाणाहून निवडून आलेले सपाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी विधिमंडळ कामकाज पत्रिका हिंदीतून मिळावी अशी मागणी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे केली आहे. अबू आझमी यांच्या मागणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली असून अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे, असा इशारा राज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
महाराष्ट्रात केवळ मराठीच चालणार, असे ठणकावून सांगताना राज म्हणाले की, एवढाच जर हिंदीचा पुळका आला असेल तर अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे. इथे महाराष्ट्रात ही नाटके चालणार नाहीत आणि मनसे हे खपवून घेणार नाही!
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने विधानसभा सदस्यत्वाची शपथही आपण हिंदीतूनच घेणार असून विधिमंडळ कामकाजाची माहितीही आपल्याला हिंदी भाषेतून मिळणे हा आपला अधिकार असल्याचे आझमी यांचे म्हणणे आहे. आझमी यांनी पत्रात म्हटले आहे की, आपले संपूर्ण शिक्षण उत्तर प्रदेशात झाले असल्याने आपल्याला केवळ हिंदी व उर्दू या दोनच भाषा अवगत आहेत. मराठी भाषेचा मी सन्मान करतो. मराठी ही राज्यभाषा असल्याने मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. कामकाजाची माहिती मराठीतून देण्याची परंपरा आहे, मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने इंग्रजीच्या ऐवजी हिंदी भाषेत कामकाजाची माहिती दिली जाणे स्वतंत्र भारतात अपेक्षित आहे, असे आझमी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, या देशातील राज्यांची भाषावार प्रांतरचना झाली आहे. आम्हाला सर्व भाषांविषयी आदर आहे. अबू आझमी यांनी हिंदीतून कामकाज पत्रिका मागण्याची जी नवी नौटंकी सुरू केली आहे त्याला आमचा विरोध आहे. ही विषवल्ली वेळीच ठेचून काढली पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे. अबू आझमी यांना हवे असल्यास त्यांनी उत्तर प्रदेश वा बिहारमधून निवडून यावे व तेथील विधिमंडळात हिंदीतून कारभार करावा. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असली थेरं आम्ही चालू देणार नाही

raj thakre ekvira devi

मंगलवार, 27 अक्तूबर 2009

राज ठाकरेंनी घेतले एकवीरा आईचे दर्शन

राज ठाकरेंनी घेतले एकवीरा आईचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 27th, 2009 AT 1:10 PM
लोणावळा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथील एकवीरा देवीचे दर्शन घेतले. एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवी आहे. दर्शनासाठी आलेल्या राज यांनी या वेळी मात्र कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत यश मिळावे, असे साकडे देवीला घातले नव्हते. मात्र, दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून आज आलो.
राज ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणार असे कळल्याने सकाळपासूनच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. मनसेचे आमदारही या वेळी उपस्थित होते. राज यांचे आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
देवीचे दर्शन तसेच आरती करून राज माध्यमांना सामोरे गेले. तेथे उपस्थित असलेले आमदार रमेश वांजळे यांना त्यांनी फटकारले. लवकरात लवकर दागिने काढा, असे वांजळे यांना बजावले.

शनिवार, 24 अक्तूबर 2009

raj thakre zee chovis taas 2



raj thakre zee chovis taas 1

raj or uddhav :who is better 1

raj or uddhav :who is better 2

raj or uddhav :who is better 3

raj thakre ibn lokmat interview 2

raj thakre 1 ibn lokmat interview

raj thakre 3 ibn lokmat interview

राज ठाकरे यांची वांजळे यांना साधे राहण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 24th, 2009 AT 12:10 AM



खडकवासला - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित आमदार रमेश वांजळे आता आपल्या अंगावरील दोन किलो सोन्याचे दागिने काढून ठेवणार आहेत. त्याबाबत त्यांना "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचना केल्याचे समजते.
निवडणुकीत निवडून आल्यानंतर श्री. ठाकरे यांना भेटण्यासाठी आमदार वांजळे शुक्रवारी सकाळीच मुंबईला रवाना झाले होते. श्री. ठाकरे यांच्या निवासस्थानी आमदार वांजळे यांनी भेट घेतली. या वेळी त्यांच्याबरोबर मतदारसंघातील काही कार्यकर्ते व पत्नी बरोबर होती. त्यांनी अंगावर दोन किलो सोने घातले आहे. यामुळे त्याची चर्चा सध्या देशभर गाजत आहे.
""राहणी साधी ठेवा. गोरगरीब, गरजू लोकांची सेवा करा. पक्षाचे काम सामान्य जनतेपर्यंत पोचवा. जनतेने मोठा विश्‍वास तुमच्यावर दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासाला सार्थ ठरण्यासाठी तुम्हीही मोठे काम उभारून दाखवा,'' अशी सूचना ठाकरे यांनी या वेळी आमदार वांजळे यांना केली. त्यानुसार वांजळे येत्या काही दिवसांत गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने काढूनच विधानसभेच्या सभागृहात प्रवेश करणार असल्याचे समजते. याबाबत आमदार वांजळे येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

मंगलवार, 20 अक्तूबर 2009

raj thakre wikipedia

Raj Shrikant Thackeray

  Raj at MNS Koli Festival.jpg

Personal life

Raj Thackeray was born on June 14,With The Name Swaraj Thackeray in 1968[1] in a Marathi Kayastha (CKP) family to Shrikant Keshav Thackeray and Kunda Thackeray, Shrikant Thackeray was the younger brother of Shiv Sena supremo Balasaheb Thackeray and Raj's mother Kunda Thackeray is the younger sister of Balasaheb Thackeray's wife Meena Thackeray. Raj's father Shrikant Thackeray was a musician, cartoonist and was also well versed in the language of Urdu. He also made a couple of Marathi films. Raj is married to Sharmila, daughter of famous Marathi theater/films actor, producer-director Mohan Wagh. They have one son named Amit Thackeray and one daughter Urvashi.
Raj Thackeray did his schooling from Bal Mohan Vidya Mandir School in the central Mumbai suburb of Dadar, close to his residence in Shivaji Park and later on graduated from the prestigious Sir J.J College of Art."[2]
Like his father and uncle Raj is a gifted painter and cartoonist. He had also expressed his desire to work for Walt Disney Studios. Raj Thackeray said when asked what he would have done had he not joined politics. "In my college days, I wanted to work with Walt Disney Studios. I drew cartoons even before my foray in politics. Film making is also a passion. I would have been doing either of these things."[3][4] [5]
Raj is also an avid photographer like his cousin Uddhav Thackeray. Raj has also published a photo-biography on his uncle titled 'Bal Keshav Thackeray' - a photo-biography.[citation needed]

 Political career

Early life

Raj Thackeray's commonly-used name is a contraction of Swararaj. His parents were Shrikant Thackeray (younger brother of Bal Thackeray) and Kunda Thackeray (younger sister of Bal Thackeray's wife Meena Thackeray). As a child he learnt the tabla, the guitar and the violin. He had a keen sense of music. He also loved drawing which later turned into a passion for drawing cartoons. He used to contribute cartoons to Marmik, the weekly magazine of his school.[1]

Political career

Political Views

Marathi identity

Raj Thackeray and his party, Maharashtra Navnirman Sena, state that Maharashtra State, Marathi language and Marathi Manoos are subverted by the influence of Marathi politicians.[3]

Opposition to immigrants

Raj Thackeray has opposed immigration into Maharashtra from Uttar Pradesh and Bihar.[4]

Violence in Agitations

Raj Thackery and his party have been criticized for use of violence during their agitations, especially directed towards immigrants from UP and Bihar. On use of violence, Thackeray says that violence is a part of all agitations in Indian politics, and there are several cases of much more violence carried out by other parties and organisations. According to him, the incidences of violence involving members of his party have been unduly highlighted by North Indian politicians and journalists.[4]

Support of Narendra Modi

Thackeray is an admirer of Gujarat Chief Minister, Narendra Modi for his governance, and the development of Gujarat during his tenure. In August 2008, Raj Thackeray visited Gujarat on a 9-day trip as 'state guest' to study the development in Gujarat. He also advised politicians in Maharashtra, irrespective of party, to take lessons from Modi and Gujarat.[5] He has also expressed support for Modi for the post Prime Minister of India for the 2014 Lok Sabha (general) election.[6]

Controversies & Agitations

2008 violence against UP & Biharis

In February 2008 Raj Thackeray led a violent movement[7][8] in what was labelled an andolan (uprising/ protest) against the dominance of migrants from the North Indian states of Uttar Pradesh and Bihar in Maharashtra and more so in its commercial capital of Mumbai. His party and Shiv Sena banned Australian cricketers participating in IPL 3 from playing in Mumbai as a protest against the attack on Indian students down under.[9] At a rally in Shivaji Park, Raj warned that if the dadagiri (intimidating dominance) of these people in Mumbai and Maharashtra continued, he would be compelled to make them leave the metropolis.[10] Raj was arrested along with a Samajwadi Party leader, Abu Azmi, for their involvement in the fracas, but was released on paying a penalty of INR15000 (US$270).

Acquittal in Kini murder case

In July 1996, Ramesh Kini was found dead in a cinema in Pune. Kini was a tenant in a ramshackle tenement in central Mumbai, whose landlord, Laxmikant Shah, was trying to evict him. Shah also happened to be a close childhood friend of Raj Thackeray. A CBI enquiry was later issued for the case, but the CBI dismissed the case as one of suicide.[11]

Kohinoor mill controversy

Shiv Sena opposed sale of mill land, but Raj Thackeray bid for and won mill land in prime Mumbai real estate.[12] On 21 July 2005, Raj and Unmesh Joshi, son of Shiv Sena Leader Manohar Joshi purchased a five acre plot of land, Kohinoor Mill No. 3, located across the road from the Shiv Sena party headquarters in Dadar, Mumbai for INR421 crore (US$77 million). The NCP leader from Mumbai, Sachin Ahir, objected to the sale of the Kohinoor Mill land, saying that there were forty bids, yet only three were short-listed. He demanded a re-bid as there was a lack of transparency in the move.[13]

Insistence on Marathi signboards for Mumbai shops

In July 2008, Raj issued a public warning that Mumbai shops needed to have Marathi signboards in addition to the existing English signboards. He warned that after one month, MNS workers would start blackening non-Marathi signboards. While there had been a law to this effect passed earlier by Brihanmumbai Municipal Corporation, it had not been enforced.
Raj had also insisted that the Marathi signboards had to be at least as big as the English signboards. A number of big shopowners, notably Viren Shah (Roopam chain) went to court against this move. The high-court provided them relief, passing a judgement that the Marathi signboards did not have to be as big as English signboards.[14]
In September 2008, MNS workers resorted to blackening signboards, to enforce the demand, after which most shop owners complied. Six MNS workers were arrested but later released on bail. The Congress government was dilatory in filing chargesheets against them, following which the Maharashtra high-court passed strictures against the government. When the government prosecutor submitted in December that the chargesheets had not been filed as investigation was ongoing, the judge remarked sarcastically whether this was a murder case to warrant such long investigations, three months after the arrest of the MNS workers, but Raj was attempting to enforce a rule previously on the books. [15]

Reaction to Jaya Bachchan's controversial statement

The words of Jaya Bachchan, veteran actor and sitting Rajya Sabha MP of Samajwadi Party (with whom Raj's MNS has crossed swords a number of times), during the Music launch of the Hindi film Drona, were deemed hurtful by Raj Thackeray.
Jaya's words 'Hum UP (Uttar Pradesh) ke log hain, isliye Hindi mein baat karenge, Maharashtra ke log Maaf Kijiye' (We are people of UP, so we will speak in Hindi. People of Maharashtra, please excuse) after her candid response to the film's director, Goldie Behl, making his introductory speech in English and subsequently encouraging the actress Priyanka Chopra to speak in Hindi.[16]
Raj commented that Jaya had no business alluding to all the people of Maharashtra in that statement. He threatened to ban all Bachchan films unless Jaya apologised in a public forum for hurting Maharashtrians. MNS workers began to attack theatres screening The Last Lear starring Jaya Bachchan's husband, Amitabh Bachchan. Shivsena MP Sanjay Raut also criticized Jaya's statement saying: "After making all your success & fortune in Mumbai, if you feel like saying that, its very unfortunate." It was only after Amitabh tendered an apology that the screening resumed.[17]
Following Raj's threat, Mumbai police acted against Raj, issuing a gag order preventing him from speaking to the media.[18]

Against Jet Airways layoffs

In October 2008, on the eve of the major Indian festival Diwali, Jet Airways laid off 800 temporary workers and announced layoffs of an additional 1100 workers. The laid-off workers included Marathi as well as North-Indians. These workers met Raj Thackeray and asked him to intervene.
Following this, Raj Thackeray declared that most of these workers had paid security deposits to the company, and he would meet Jet management to plead their case. Unless Jet Airways cancelled the layoffs, his party would not allow any Jet Airways plane to take off from any airport in Maharashtra.[19]
Within 12 hours of Raj Thackeray's declaration, Jet chairman Naresh Goyal reversed the layoffs and reinstated the sacked employees. He claimed that he did it on his own and that there was no political pressure on him. Leftist Unions, Shivsena & Civil Aviation minister Praful Patel later tried to take credit for the decision. On announcement of the layoffs, Praful Patel had claimed that he had no jurisdiction over the layoffs issue.[20] Sacked Jet employees on the other hand stated that they were warned by Jet management on reinstatement, not to meet Raj Thackeray to thank him.[21]

Remarks on Chhath Puja and Migrants

Raj reproached North Indian leaders for politicizing Chhath Puja, a festival popular in easern Uttar Pradesh, Bihar, and Jharkhand calling it a "drama" and a "show of numerical strength". He stated that the Chhath Puja was a political gimmick by some parties to attract the north Indian vote. He questioned the motives by citing that the puja is performed on the banks of a river, not the sea as it was being performed.[22] He demanded that they only celebrate Maharashtra day and not UP day in Maharashtra. A petition was filed in the Patna civil court on 8 February against him for his remarks.[23] His statements drew flak from political leaders across the board, especially those from the North Indian states. The then Indian Railways minister and former chief minister of Bihar, Lalu Prasad Yadav, vowed that he would come to Mumbai and perform Chhath Puja in front of Raj's house, which he failed to perform. He also ridiculed Raj saying, "He [Raj] is a child in politics".[22] The Navnirman Sena leader accused migrants of swamping Maharashtra, India's most industrialised state, in search of jobs.[24]
The MNS chief also accused migrants of disrespecting the local culture. On 9 February, expressing his stance on new migrants settling in Mumbai, Raj said, "New immigrants to the city should be denied entry into the city, while those already staying here should show respect to the Marathi 'manoos' and his culture".[25]

Mumbai-Bombay Controversy: Wake Up Sid

On 2 October 2009, MNS workers disrupted the screening of the film Wake Up Sid on its release in a few Pune and Mumbai theatres, after Raj objected to references in the movie to "Bombay" rather than "Mumbai". The city of Mumbai was referred to as "Bombay" in many scenes[26] and in some songs (lyrics by Javed Akhtar). The film's producer, Karan Johar, visited Raj's residence to apologise, and agreed to all of Raj's terms, including an apology on each of the 700 frames in the film.[27]

MLA attacked in Maharashtra State Assembly

On 9 November 2009, during the oath-taking ceremony of the Maharashtra State Legislative Assembly, MLAs from MNS physically attacked Samajwadi party leader, MLA Abu Asim Azmi, as he began his oath in Hindi instead of Marathi. Having been provoked by Abu Azmi that he would not take the oath as legislator in Marathi, Raj Thackeray had earlier warned the legislators to "take their oaths in Marathi only or else face dire consequences". Azmi was pushed, punched and slapped by MNS legislators even as other legislators who tried to protect Azmi were pushed away. Other slogan-shouting MNS members displayed cloth banners they had smuggled into the house and also damaged the fittings on legislators' desks. Condemning the incident, the Assembly swiftly passed a resolution suspending the four MNS legislators — Shishir Shinde, Ramesh Wanjale, Ram Kadam and Vasant Gite for four years. They were also barred from entering Mumbai and Nagpur whenever the assembly met in the two cities. Abu Azmi was the only MLA the MNS members protested against; they did not object to members who took their oath in other languages such as Sanskrit and English.[28]

Demand for introduction of Telecom customer service in Marathi

Telecom companies in Maharashtra had been providing customer service in English & Hindi only. Raj demanded that all telecom companies operating in Maharashtra start providing the service in Marathi also and set a deadline of 27 February 2010, after which his party MNS would launch an agitation. Following this demand, all telecom companies complied, introducing Marathi as an additional option in their customer service.[29]

Kalyan Dombivali 2010 Elections

Raj Thackeray had a spat with his uncle Bal Thackeray during election rallies for the first time since the inception of MNS. Both the parties declared war of words. The result of election were MNS winning 28 seats and Shiv Sena winning 31 seats.

Maharashtra-Karnataka Border Issue

In Dec 2011, Raj Thackeray meeting a group from MES (Maharshtra Ekikaran Samiti) advised them that they should revisit their stand of merging Belgaum with Maharashtra in the interest of marathi speaking people of Belgaum. In a major departure from the earlier held stand of traditional right wing groups of Maharashtra, Raj Thackeray pointed out that a practical approach rather than an emotional one is the need of the hour.However,he advocated that if the supreme court itself gives a decision in favor of Belgaum's merger, he would welcome it but the local situation in belgaum should not be vitiated for the sake of it. He asked the MES leaders to first identify the real issue as to whether marathis in belgaum are being targeted for espousing the cause of marathi language or because they were supporting the merger of belgaum with Maharashtra. Lamenting that strikes and bandhs only add to the misery of the Marathi-speaking community in Belgaum, Thackeray said: "If the Karnataka government is ready to respect the Marathi people, their culture and language, then there is nothing wrong in Belgaum being there."[30] His comments were strongly criticized by his cousin Uddhav Thackeray as a cruel joke on the marathi manoos.[31]

Personal life

Raj is married to Sharmila, daughter of Marathi actor, producer-director Mohan Wagh. They have one son named Amit Thackeray and one daughter Urvashi Thackeray.

शुक्रवार, 16 अक्तूबर 2009

झोत राज ठाकरे-मनसे यांच्यावरच

झोत राज ठाकरे-मनसे यांच्यावरच
मृणालिनी नानिवडेकर
Friday, October 16th, 2009 AT 7:10 PM



विधानसभा निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षण चाचण्यांनी सत्तारूढ आघाडीलाच कौल दिला असला, तरी अन्य राजकीय पक्षही आपापले समर्थक गोळा करून ठेवण्याच्या प्रयत्नांत आहेत. बंडखोरीमुळे अपक्ष निवडून आले तर ते गळाला कसे लावायचे, याच्या योजना आखल्या जाताहेत. घोडेबाजाराची वेळ आलीच, तर भाव वधारण्याच्या आशेवर अपक्ष दिवाळीचे चार दिवस आनंदात घालवताहेत. मतयंत्रातून बाहेर काय पडेल, याची खात्री देणे शक्‍य नसलाने निकालानंतरच्या राजकीय चित्रावर भाष्य करण्यास शहाणे लोक नकार देत आहेत. निकाल कसाही लागो, एक मात्र उघड आहे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चर्चा आणि मीमांसा करण्यात राजकीय पंडितांचा अर्धाअधिक वेळ खर्ची पडणार आहे. राज यांच्या जवळच्या काही मंडळींनी त्यांनाही कौल काय राहील हे जाणण्याची उत्सुकता असल्याचे सांगायला प्रारंभ केला आहे. स्वत: राज यांनी "आता निकाल परमेश्‍वराच्या हाती', असे विधान करत दुसरीकडे "मनसे'च्या मदतीशिवाय कोणतेही सरकार सत्तेत येणार नाही, असे नमूद केले आहे. निकाल काहीही असला, तरी राज यांच्यावरचा प्रकाशझोत कमी होणार नाही. राज यांच्या करिष्म्याची ही निष्पत्ती आहे. राज यांनी उद्धव यांच्या नेतृत्वाला आक्षेप घेत आव्हान भावाला दिले की थेट बाळासाहेब ठाकरेंच्या उत्तराधिकाऱ्याविषयीच्या निर्णयाला, असा प्रश्‍न गर्दीने उभा केला. शिवसेनाप्रमुखही शिवाजी पार्कवर अधिक वेळ नाव न घेता राजवरच बोलले. "मी महाराष्ट्रावर वचक ठेवू शकतो', असे ठासून बोलत फिरल्याने सुस्त कारभाराला कंटाळलेली जनता राज यांच्या मागे गेली. ही गर्दी मतात परिवर्तित झाली, तर गेल्या दहा वर्षांत कुठलीही छाप पाडू न शकलेल्या सत्ताधारी पक्षाला लगाम लावू न शकलेल्या विरोधी पक्षांना कंटाळलेली जनता विरोधी पक्ष म्हणून नवा पर्याय शोधू लागली आहे का, याची तपा
सणी करण्याची वेळ येईल. खरे तर उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आत्महत्या, भारनियमन, महागाई हे विषय हाती घेत महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. राणे आणि पाठोपाठ राज यांच्या बंडामुळे वादग्रस्त झालेले उद्धव खचून न जाता राज्यभर फिरले. गेली पाच वर्षे त्यांनी केलेली मेहनत वादातीत आहे. ती खुद्द राजही नाकारणार नाहीत; पण, उद्धव यांच्या नेतृत्वाला विधिमंडळातील संघर्षाची जोड मिळाली नाही. किंबहुना, अशी जोड देणारे सहकारी स्वत: उद्धवच समोर आणू शकले नाहीत. राजकीय सामना कित्येक आघाड्यांवर लढायचा असतो. केवळ प्रामाणिक मेहनत पुरेशी नसते.
घराण्यातून समोर येणारे नेतृत्व ही खरे तर कॉंग्रेसची मक्‍तेदारी. पण, शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे यांच्या गैरकॉंग्रेसी घराण्याने महाराष्ट्राला दोन नवे नेते दिले, हे मान्य करायलाच हवे. दोघेही मेहनती आहेत. स्वत:साठी राजकारणात जागा निर्माण करण्यासाठी धडपडणारे आहेत. हे साधर्म्य मान्य केल्यावर मग पुढे होते ती तुलना. निकालानंतर ही तुलना अधिकच गहिरी होणार आहे. शिवसेनेच्या जागा ६० च्या वर गेल्या, तर निश्‍चितच उद्धव यांचे नेतृत्व कसाला उतरेल. त्या ५० ते ६० च्या आसपास राहिल्या, तर प्रतिकूलतेतही उद्धव यांनी पत राखली, असे विश्‍लेषण केले जाईल आणि जागांची संख्या त्यापेक्षाही खाली गेली तर उद्धव यांचे नेतृत्व नाकारले गेल्याचा निष्कर्ष काढत "शिवसेनेचे आता पुढे काय' अशी चर्चा सुरू होईल. तिन्ही शक्‍यतांमध्ये राज यांच्यावरचा झोत जराही कमी होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या, तर राज यांचा मराठीचा कथित कैवार टीकेचा विषय ठरेल. हा पक्ष ६० च्या आसपास राहिला तर राज यांनी चांगले यश मिळवले, असे नमूद करत त्यांना कॉंग्रेसने मदत केल्याचा आरोप नव्याने होईल. तिसरी शक्‍यता प्रत्यक्षात येत शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जागा कमी मिळाल्या, तर मात्र राज यांच्यावरचा प्रकाशझोत प्रखर होईल. या तिन्ही शक्‍यतांमध्ये राज यांच्या आगामी राजकारणाची दिशा काय असेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. या निवडणुकीत मनसेला मान्य होवो किंवा न होवो, भाजप-सेनेच्या सत्तेत परतण्याच्या मार्गातला गतिरोधक म्हणूनच राज यांच्याकडे पाहिले गेले.
प्रश्‍न मराठी अस्मितेचा
राज यांनी आव्हान दिलेल्या उद्धव यांचे नेतृत्व कुचकामी आहे हे दाखवण्याची संधी या निवडणुकीने दिली. खरा प्रश्‍न आहे तो "नंतर काय' हा. अडीच वर्षांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर "मनसे' लक्ष केंद्रित करेल; पण, निवडणुकीच्या या राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी हाती घेतलेल्या मराठी अस्मितेचा प्रश्‍न पुढे येईल. मुंबईतील मराठी टक्‍का कमी झाला आहे हे मान्य; पण या बहुआयामी शहरात लोंढे रोखण्याचा कायदा खरेच करता येईल का? सुशासनासाठी "मनसे' निवडून आलेल्या सरकारवर अंकुश ठेवू शकेल का? गेली पन्नास वर्षे काका जे बोलत आहेत, त्या पलीकडे राज यांनी जाणे आवश्‍यक आहे. मुंबई व महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे पडला आहे. मुंबई-पुण्याचे टापू वगळता राज्याचे दरडोई उत्पन्न फार कमी आहे. मुंबईच्या प्रगतीलाही मर्यादा पडताहेत. हे प्रश्‍न केवळ अस्मितेचे नाहीत, तर जनतेच्या जीवनमरणाचे आहेत. गर्दीने डोक्‍यावर घेतलेल्या राज यांनी हे प्रश्‍न गंभीरपणे हाती घेतले तर बरे होईल.

(सकाळ )

 

बुधवार, 14 अक्तूबर 2009

raj thakre 2 sam marathi

raj thakre 3 sam marathi

मनसेचे उमेदवार राम कदम यांना अटक


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 14th, 2009 AT 1:10 PM

मुंबई - पोलिसांशी हुज्जत घालून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) घाटकोपर पश्‍चिमचे उमेदवार राम कदम यांना आज (बुधवारी) अटक करण्यात आली.
काल (मंगळवारी) मतदान सुरू असताना सर्वोदय विद्यालय (भीमनगर) येथील मतदान केंद्रावर कदम यांनी पोलिसांशी हुुज्जत घातली. गर्दी गोळा केली तसेच पोलिसांना धमकीही दिली होती. त्यामुळे कालच पोलिसांकडून कदम यांच्या अटकेची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. आज दुपारी कदम यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी जाऊन पोलिसांनी त्यांना अटक केली.

मंगलवार, 13 अक्तूबर 2009